भारतप्रकरणी रशियाचा खोटेपणा..! युक्रेनमध्ये भारतीय आहेत ‘ताब्यात’..! पहा दावा आणि त्यावर प्रत्युत्तर काय ते
दिल्ली : रशियाने दावा केला आहे की आपले सैन्य कीव आणि खार्किवमधून भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी मदत करत आहे, परंतु युक्रेनने भारतीयांना ओलीस (Indian Hostage in Ukraine) ठेवले आहे. मात्र, काही तासांतच भारताने हा दावा साफ फेटाळून लावला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने आज सकाळी जारी केलेल्या निवेदनात स्पष्टपणे म्हटले आहे की, युक्रेनमधील आमचा दूतावास तेथील भारतीय नागरिकांच्या सतत संपर्कात आहे. एमईएने सांगितले की अनेक विद्यार्थ्यांनी युक्रेन प्रशासनाच्या मदतीने काल खार्किव सोडले. युक्रेनमध्ये कोणत्याही विद्यार्थ्याला ओलीस ठेवण्यात आल्याचे कोणतेही वृत्त आम्हाला मिळालेले नाही.
Our response to media queries regarding reports of Indian students being held hostage in Ukraine ⬇️https://t.co/RaOFcV849D pic.twitter.com/fOlz5XsQsc
Advertisement— Arindam Bagchi (@MEAIndia) March 3, 2022
Advertisement
रशियाच्या हल्ल्यानंतर भारत पूर्व युरोपीय देश युक्रेनमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी ऑपरेशन गंगा हे अभियान राबवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष, युक्रेन आणि त्याच्या शेजारी देशांच्या नेत्यांच्या सतत संपर्कात आहेत. काही तासांपूर्वीच त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी बोलून युक्रेनमधून भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याबाबत चर्चा केली होती. मात्र, रशियाने असा दावा केल्याने भारत सरकारतर्फे केल्या जात असलेल्या दाव्यावर प्रश्न उपस्थित झालेले आहेत. दोन्ही नेत्यांनी युक्रेनमधील परिस्थितीचा आढावा घेतला, विशेषत: खार्किवमध्ये, जिथे मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. गेल्या सहा दिवसांत पंतप्रधानांची पुतीन यांच्याशी चर्चा होण्याची ही दुसरी वेळ आहे. सुमारे 20,000 भारतीयांपैकी 6,000 लोकांना आतापर्यंत घरी आणण्यात आले आहे.
पीएम मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष यांच्यातील चर्चेनंतर रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे धक्कादायक विधान समोर आले आहे. त्यात म्हटले आहे की रशियन सैन्य भारतीयांना बाहेर काढण्यासाठी मदत करत आहे पण युक्रेन आता भारतीय विद्यार्थ्यांना रोखले जात आहे. खरं तर, खार्किव आणि कीवमधील परिस्थिती बिघडली आहे आणि भारत सरकारने लवकरात लवकर तिथून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी कारवाई तीव्र केली आहे. भारतीय नागरिक अजूनही तेथे अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी सुरक्षित मार्ग देण्यात यावा, अशी चिंता भारताने व्यक्त केल्यानंतर रशियाचे हे वक्तव्य आले आहे. यानंतर रशियाने युक्रेनवरच गंभीर आरोप केले. तथापि, MEA ने एक निवेदन जारी करून माध्यमांच्या प्रश्नांची उत्तरे दिली ज्यामध्ये असे म्हटले जात होते की युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थी ओलिस आहेत का? परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की, आम्ही भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी रशिया, रोमानिया, पोलंड, हंगेरी, स्लोव्हाकिया आणि मोल्दोव्हा या प्रदेशातील सर्व देशांसोबत काम करत आहोत. गेल्या काही दिवसांत मोठ्या संख्येने भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. युक्रेन सरकारच्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. आम्ही युक्रेनच्या पश्चिम सीमेजवळील शेजारी देशांचेही आभार व्यक्त करतो जे भारतीय नागरिक मायदेशी परत येईपर्यंत त्यांच्या राहण्याची व्यवस्था करत आहेत.