India Population Report : भारताने लोकसंख्येच्या बाबतीत चीनला (China) मागे टाकले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या (India Population Report) ताज्या अहवालात भारत आता जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. अहवालानुसार आता भारताची लोकसंख्या 142.86 कोटी झाली आहे. त्याच वेळी, चीन 142.57 कोटींसह दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार भारताच्या लोकसंख्येमध्ये एका वर्षात 1.56 टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारताचा एकूण प्रजनन दर 2.0 आहे. या अहवालातील आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे भारतातील 25 टक्के लोक हे ०-१४ वयोगटातील आहेत. हा अहवाल 1978 पासून प्रसिद्ध होत आहे.
जगाची लोकसंख्या 8 अब्ज
UN च्या अहवालानुसार, भारतीय पुरुषांचे सरासरी आयुर्मान 71 वर्षे आणि महिलांचे 74 वर्षे आहे. UNFPA भारताच्या प्रतिनिधीने सांगितले की, आता जगाची लोकसंख्या 8 अब्जांवर पोहोचली आहे. भारताच्या 1.4 अब्ज लोकांना आपण संधी म्हणून पाहणार आहोत. ते म्हणाले की, भारत हा एक शक्तिशाली देश आहे. ते शिक्षण, सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता आणि आर्थिक विकासाच्या बाबतीत स्थिर प्रगती करत आहे.
या अहवालात भारतातील 25 टक्के लोकांचे वय 0-14 वर्षे आहे. यानंतर 10-19 वयोगटातील 18 टक्के लोक आहेत. 10-24 वयोगटातील लोकांची संख्या 26 टक्के आहे. पण भारतात ते 15-64 वर्षांच्या दरम्यान 68 टक्के आहे. म्हणजेच भारतात तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. त्याचवेळी चीनमध्ये परिस्थिती बिघडत असून तेथे वृद्ध नागरिकांची संख्या वाढत आहे.
चीन मध्ये वृद्ध जास्त
चीन वृद्ध लोकसंख्येमुळे त्रस्त आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की 200 दशलक्ष लोक 65 वर्षांपेक्षा जास्त आहेत. चीनमधील सुमारे 40 टक्के लोकसंख्या 60 वर्षांपेक्षा जास्त वयाची आहे. इथे एकेकाळी लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियम बनवले गेले. आता लोकसंख्या वाढवण्यासाठी चीन सरकार रोज नवनवीन प्रलोभने देत आहे. तरीही येथील लोक एकापेक्षा जास्त मुलांना जन्म देत नाहीत.