जगभरात अनेक आश्चर्यकारक घटना घडत असतात. त्यातील काहींचे उत्तर मिळते तर काहींचे उत्तर न मिळाल्याने त्यावर संशोधन चालू असते. अशीच एक आश्चर्यकारक घटना भारत देशातील एका गावात घडते. जिथे प्रतिवर्षी हजारो पक्षी आत्महत्या करतात.
ही घटना घडते ईशान्य भारतातील सर्वात मोठे राज्य असलेल्या आसाम राज्यात. आसाममधील दिमा हसो जिल्ह्याच्या डोंगरावर वसलेली जटिंगा व्हॅली पक्ष्यांच्या आत्महत्या बिंदू म्हणून प्रसिद्ध आहे. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात पक्ष्यांच्या आत्महत्येमुळे जिंगाटा गाव हेडलाईन बनते. केवळ स्थानिक पक्षीच नाही तर स्थलांतरित पक्षी देखील या ठिकाणी पोहोचतात आणि आत्महत्या करतात. यामुळे जटींगा हे गाव अत्यंत रहस्यमय मानले जाते.
- काँग्रेस देणार महाविकास आघाडीला धक्का? ; BMC निवडणुकीसाठी घेतला मोठा निर्णय
- अखेर ‘त्या’ प्रकरणावर अखिलेश यादव ने सोडले मौन; केला मोठा दावा, म्हणाले भाजप..
- मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय; ‘या’ राज्यात धर्मांतर विरोधी विधेयकाच्या अध्यादेशाला मंजुरी
- मोठी बातमी! ‘त्या’ प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अण्णा हजारे करणार आंदोलन; म्हणाले,12 वेळा..
- Blog: “सरकारचे धोरणं आणि शेतकऱ्यांच्या 100% मरणं”
आत्महत्या करण्याची प्रवृत्ती मानवांमध्ये सामान्य आहे, परंतु पक्ष्यांच्या बाबतीत हे पूर्णपणे भिन्न आहे. जटिंगा गावात पक्षी वेगात उडतात आणि इमारतीत किंवा झाडावर आदळतात आणि ठार होतात. हे एकासाठी नव्हे तर हजारो पक्ष्यांसह होते. सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे हे पक्षी संध्याकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत असे करतात. सामान्य हवामानात हे पक्षी दिवसा बाहेर जाऊन रात्रीच्या वेळी घरट्याकडे परत जातात. मात्र, या दिवशी असे होत नाही.

स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या जवळपास 40 प्रजाती या आत्महत्येच्या शर्यतीत सहभागी होतात. नैसर्गिक कारणांमुळे नऊ महिने जटिंगा गाव बाह्य जगापासून अलिप्त असते. इतकेच नाही तर जटींगा खोऱ्यात रात्री प्रवेश करण्यास मनाई आहे. पक्षी तज्ञांचा असा विश्वास आहे की चुंबकीय शक्ती या रहस्यमय घटनेचे कारण आहे.
ओलसर आणि धुके असलेल्या हवामानात वारे वेगाने वाहत असताना पक्षी रात्रीच्या अंधारात दिव्याभोवती उडतात. जास्त प्रकाश नसल्यामुळे त्यांना स्पष्ट दिसत नाहीत. मग ते इमारत, झाडे किंवा वाहनांना धडकतात. अशा परिस्थितीत लाईट लावून जाटिंगा गावत संध्याकाळी गाड्या चालविण्यास मनाई आहे. तथापि, असे असूनही पक्ष्यांच्या मृत्यूच्या घटना काही कमी झालेल्या नाहीत.
संपादन : माधुरी सचिन चोभे
कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.
- काँग्रेस देणार महाविकास आघाडीला धक्का? ; BMC निवडणुकीसाठी घेतला मोठा निर्णय
- सुरेश रैनाने सोशल मीडियावर ‘हे’ काय लिहिले? कमेंट झाली व्हायरल; अनेक चर्चांना उधाण
- अखेर ‘त्या’ प्रकरणावर अखिलेश यादव ने सोडले मौन; केला मोठा दावा, म्हणाले भाजप..
- Agriculture News: मालदांडी खातेय Rs. 4800/Q चा भाव; पहा राज्यभरातील बाजारभाव
- मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय; ‘या’ राज्यात धर्मांतर विरोधी विधेयकाच्या अध्यादेशाला मंजुरी