“या” मालिकेत पुन्हा एकमेकांविरुद्ध भिडणार भारत – पाकिस्तान,रमीझ राजा घेणार पुढाकार
मुंबई – बाबर आझमच्या नेतृत्वाखाली, पाकिस्तान क्रिकेट संघाने T20 विश्वचषक 2021 मध्ये साखळी सामन्यात भारताचा पराभव केला आणि ICC विश्वचषक स्पर्धेत प्रथमच, पाकिस्तानने भारतावर विजय मिळवला. बाबरच्या नेतृत्वाखाली, पाकिस्तानच्या संघाने नऊ वर्षांत प्रथमच टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. 2021 मध्ये क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये पाकिस्तानने चांगली कामगिरी केली होती आणि आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा (Rameez Raja) यांनी 2022 मध्ये पुन्हा भारत-पाक ( India-Pakistan) यांच्यात सामने सुरु करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
PCB चे अध्यक्ष रमीझ राजा हे वार्षिक चतुर्भुज मालिका प्रस्तावित करणार आहेत ज्यात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, भारत आणि पाकिस्तान यांचा समावेश असेल. पांढऱ्या चेंडूच्या स्वरूपात भारत-पाक यांचे सामने पुन्हा सुरु करण्याच्या उद्देशाने, PCB प्रमुख रमीझ राजा पुढील आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) बैठकीत पारंपारिक आशियाई प्रतिस्पर्धी आणि अॅशेस कट्टर प्रतिस्पर्धी यांच्यात चतुर्भुज मालिका प्रस्तावित करतील. कोड स्पोर्ट्स ऑस्ट्रेलियाने दिलेल्या वृत्तानुसार, चार देशांची टी-20 स्पर्धा खेळण्याची कल्पना माजी पाकिस्तानी कर्णधार आणि पाकिस्तानमधील सर्वोच्च क्रिकेट बोर्डाचे विद्यमान अध्यक्ष यांनी मांडली आहे.
2013 पासून, भारत आणि पाकिस्तान फक्त ICC आणि ACC स्पर्धांमध्ये खेळत आहेत. दोन्ही देशामधील असणाऱ्या राजकीय तणावामुळे भारत आणि पाकिस्तान या दोन स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतात. भारत आणि पाकिस्तानची शेवटची भेट 2021 च्या T20 वर्ल्ड कपमध्ये झाली होती. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 10 विकेट्सने मोठ्या फरकाने पराभव केला होता. या विश्वचषकात भारताला गट फेरीच्या पुढे जाता आले नाही आणि दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्याचे त्याचे स्वप्न अधुरे राहिले.(India-Pakistan will face each other again in this series, Rameez Raja will take the initiative)