रोहीतनंतर भारताचा कर्णधार कोण? रवी शास्त्रींने केली मोठी भविष्यवाणी; म्हणाले IPL..

मुंबई – भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचे मत आहे की, आयपीएल-15 (IPL 2022) ही टीम इंडियाचा भावी कर्णधार शोधण्याची मोठी संधी आहे. शास्त्री म्हणाले की, ऋषभ पंत ते श्रेयस अय्यरपर्यंत ही स्पर्धा भावी कर्णधार घडवू शकते.
रोहितनंतर कर्णधार कोण
आयपीएलमध्ये सात वर्षांनंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये उतरणाऱ्या शास्त्री म्हणाले की, रोहित शर्मा सध्या आपले काम सर्वोत्तम पद्धतीने करत आहे. विराट कोहली आता कर्णधार नाही, तर रोहितचा पांढऱ्या चेंडूच्या फॉरमॅटमध्ये एकही सामना हारला नाही.
तरीही भारताचा भावी कर्णधार कोण असेल हे पाहणे बाकी आहे. श्रेयस अय्यर, ऋषभ पंत आणि केएल राहुलचे पर्याय आहेत आणि तिघेही यावेळी आयपीएलचे नेतृत्व करत आहेत. आयपीएल ही भावी कर्णधाराला पुढे आणण्याची मोठी संधी आहे.
वेगवान गोलंदाजांच्याही नजरेत असेल
शास्त्री म्हणतात की, गेल्या आयपीएलमध्ये व्यंकटेश अय्यरचे नाव कोणी ऐकले नव्हते, पण स्पर्धा संपताच तो भारतीय संघात होता. त्यासाठी अशक्य गोष्ट इथे शक्य होताना दिसत आहे. हेच आयपीएलचे सौंदर्य आहे. तो म्हणाला की, हार्दिक पांड्या पहिल्यांदाच गुजरातचे कर्णधारपद भूषवणार आहे.
Kharediwala फॉर एव्हरीवन..! होय, आता आम्ही घेऊन आलोय आलेय इंडियन ईकॉमर्स..!
हार्दिक व्यतिरिक्त टीम इंडियाचे दार ठोठावणारे क्रिकेटपटू, आयपीएल त्यांच्यासाठीही मोठी संधी आहे. या वर्षी ऑस्ट्रेलियाच्या वेगवान उसळत्या खेळपट्ट्यांवर टी-20 विश्वचषक होणार आहे. अशा परिस्थितीत ही आयपीएल वेगवान गोलंदाजांसाठीही संधी असेल.