आरसीबीचे कर्णधारपद फाफ डू प्लेसिसकडे का?; विराट कोहलीने केला मोठा खुलासा, म्हणाला..
मुंबई – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये त्यांच्या विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे. यावेळी संघाची कमान नव्या कर्णधाराच्या हाती आहे. विराट कोहलीने (Virat Kohli) आरसीबीचे पद सोडल्यानंतर, फ्रँचायझीने दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिसला (Faf du plessis) संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे.
2008 मध्ये आयपीएल सुरू झाल्यापासून कोहली बंगळुरू संघाचा भाग आहे आणि 2013 पासून तो संघाचा पूर्णवेळ कर्णधारही होता. पण गेल्या मोसमात त्याने कर्णधारपद सोडले. फाफ डू प्लेसिसला आरसीबीचे कर्णधारपद मिळाल्यानंतर, कोहलीने आता दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाची निवड का केली याचा खुलासा केला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने आयपीएल मेगा लिलाव 2022 मध्ये डू प्लेसिसला 7 कोटी रुपयांना विकत घेतले.
Kharediwala फॉर एव्हरीवन..! होय, आता आम्ही घेऊन आलोय आलेय इंडियन ईकॉमर्स..!
आरसीबीच्या ट्विटर हँडलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये कोहलीने म्हटले आहे की, “लिलावात फाफची निवड करताना आमची योजना अगदी स्पष्ट होती. आम्हाला एका कर्णधाराची गरज होती, ज्याचा खूप सन्मान झाला. तो कसोटी कर्णधार राहिला आहे आणि तो अत्यंत प्रतिष्ठित क्रिकेटपटू आहे. आरसीबीमध्ये आम्ही त्याच्या नेतृत्वाबद्दल उत्साहित आहोत. तो त्याची भूमिका अतिशय चोख बजावेल. त्याचे आपल्या सर्वांशी खूप चांगले संबंध आहेत. मला खात्री आहे की मॅक्सी (ग्लेन मॅक्सवेल), दिनेश कार्तिक आणि इतर सर्व सहकारी या स्पर्धेत त्याच्या कर्णधारपदाचा आनंद घेतील.
सोमवारीच संघात सामील झाल्यानंतर कोहली आरसीबीच्या सराव शिबिरात सहभागी झाला आहे. विराटने आधीच सांगितले होते की, त्याने आरसीबीच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला कारण त्याला त्याच्या कामाचा भार सांभाळायचा होता. आयपीएलने एवढा मोठा प्रवास पूर्ण केला आहे, यावर विश्वास बसत नाही. मी येथे नवीन ऊर्जा घेऊन आलो आहे कारण मी अनेक जबाबदाऱ्या आणि कर्तव्यांपासून मुक्त आहे.