मुंबई – ICC ने महिला विश्वचषक 2022 चे (ICC woman’s cricket World Cup) नियम बदलले आहेत. जर खेळाडूंना कोरोनाची (Corona) लागण झाली असेल तर संघ केवळ नऊ खेळाडूंसह मैदानात उतरू शकतो, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हटले आहे. आयसीसीने नियमांमध्ये हे बदल केले आहेत जेणेकरून स्पर्धेदरम्यान खेळाडूंना कोरोना झाला तरी सामना थांबू नये आणि स्पर्धा सुरळीत पार पडू शकेल. यासोबतच सामना टाय झाल्यास त्याचा निकाल सुपर ओव्हरद्वारे ठरवला जाईल, असा निर्णय आयसीसीने घेतला आहे. जर सुपर ओव्हर देखील टाय झाली तर आणखी एक सुपर ओव्हर होईल आणि सामन्याचा निकाल लागेपर्यंत सुपर ओव्हर चालू राहतील.
यापूर्वी अंडर-19 विश्वचषकादरम्यान भारताच्या अर्ध्या संघाला कोरोनाची लागण झाली होती. अशा स्थितीत भारताने मोठ्या कष्टाने आपला संघ मैदानात उतरवला होता. मात्र, यादरम्यान टीम इंडियाला युगांडा आणि आयर्लंडसारख्या संघांविरुद्ध खेळावे लागले. यामुळे टीम इंडियाने दोन्ही सामने सहज जिंकले असले तरी महिला विश्वचषकात असे होणार नाही. ही परिस्थिती टाळण्यासाठी आयसीसीने सर्व संघांसाठी नवा नियम जारी केला आहे. न्यूझीलंडमध्ये 4 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान महिला विश्वचषक खेळवला जाणार आहे.
Kharediwala घेऊन आलोय आलेय इंडियन ईकॉमर्स..!
यावर बोलताना ICC इव्हेंट्सचे प्रमुख ख्रिस टेटली म्हणाले, कोरोनाच्या दृष्टीकोनातून, आम्हाला अधिक सूट देण्याची गरज आहे. विशेषत: आम्ही या कठीण परिस्थितीत सामने खेळत आहोत.
अधिक खेळाडूंसह संघ विश्वचषकात पोहोचतील
ख्रिस टेटली म्हणाले की, या विश्वचषकात अधिकृतपणे संघातील खेळाडूंची संख्या केवळ 15 आहे, परंतु राखीव म्हणून संघ त्यांच्यासोबत अनेक अतिरिक्त खेळाडू जोडू शकतात. अशा परिस्थितीत कोणत्याही संघात कोरोनाची प्रकरणे आढळल्यास राखीव खेळाडूंना संघात समाविष्ट केले जाऊ शकते. साखळी सामन्यांमध्ये सर्व संघ प्रत्येकी एक सामना खेळतील आणि त्यानंतर पहिले चार संघ ठरवले जातील.
आवश्यक असल्यास सामने बदलले जातील
जर कोरोनाची प्रकरणे वाढली आणि कोणत्याही दोन संघांमधील सामना आयोजित करणे कठीण झाले तर ते सामने नंतर आयोजित केले जातील. तथापि, प्रत्येक संघाने पूर्ण लवचिकता दाखवणे अपेक्षित आहे. 2019 च्या विश्वचषकाप्रमाणे या स्पर्धेतील चौकारांच्या संख्येच्या आधारावर विजेता ठरवला जाणार नाही. कोणत्याही सामन्यात, निकाल कळेपर्यंत, सुपर ओव्हर होतील.