मुंबई: बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवांना मुंबई महापालिका निवडणुकीत आणण्यासाठी त्यांची भेट घेतली जात आहे, अशी चर्चा असल्याचं देशपांडेंनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या बिहार दौऱ्यावरुन मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सडकून टीका केली आहे. “आदित्य ठाकरेंचा स्वत:वर आणि उद्धव ठाकरेंवर विश्वास उरलेला नाही की त्यांचे चेहरे बघून येथील लोक मतदान करतील. एका काळ असा होता की शिवसेनाप्रमुखांच्या नावावर मतं मिळायची. आता जर तुम्हाला तेजस्वी यादवांना आणावं लागत असेल, तर तुमची काय अवस्था झालीय हे एकदा आरशात बघा”, असा घणाघात संदीप देशपांडेंनी केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांविषयी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेनेसह महाविकासआघाडीचे कार्यकर्तेही आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. अशातच आदित्य ठाकरेंच्या बिहार दौऱ्यावरुन अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याबाबत शिवसेनेकडून एका निवेदनाद्वारे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. हा दौरा सदिच्छा भेटीसाठी असल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात आलं आहे. या दौऱ्यात आदित्य ठाकरेंसोबत खासदार अनिल देसाई, खासदार प्रियांका चतुर्वेदींसह काही प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
must read