मुंबई : जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. त्यांना अटक करण्यात आली. यानंतर आव्हाडांनी लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही असं म्हणून आमदारकी पदाचा राजीनामा दिला. त्यावर महाराष्ट्रातील तमाम नेत्यांच्या प्रतिक्रीया येत आहे. सुप्रिया सुळेंनी आपली प्रतिक्रीया देत, आव्हाडांची बाजू राखत त्या म्हणाल्या की “माझी जितेंद्र आव्हाड यांना विनंती आहे की, राजीनामा हे यावरचं उत्तर नाही. ते एक भावनिक आणि संवेदनशील व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांना त्रास होणं स्वाभाविक आहे. मात्र, त्यांनी राजीनामा देऊ नये. कारण, ते एक चांगले लोकप्रतिनिधी आहेत.”
“मुंब्राच्या लोकांनी खूप विश्वासाच्या नात्याने त्यांना निवडून दिलं आहे. ते मुंब्र्यात अतिशय चांगलं काम करत आहेत. मंत्री असो किंवा नसो, मात्र आदर्श आमदार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. त्यामुळे त्यांनी राजीनामा देऊ नये,” अशी विनंती सुप्रिया सुळेंनी केली. “राजकारण ज्या पातळीवर जात आहे याची मला चिंता वाटते. हे फक्त कुठला पक्ष म्हणून नाही, तर राजकीय क्षेत्रातील सर्व लोक म्हणून याकडे माणूसकीच्या दृष्टीने बघितलं पाहिजे,” असंही त्यांनी नमूद केलं. सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, “मी तो व्हिडीओ पाहिला. एकदा नाही, तर चार ते पाचवेळा पाहिला. कारण मीही एक महिला आहे. एक महिला जेव्हा तक्रार करते तेव्हा मी अगदी तटस्थपणे त्या महिलेच्या तक्रारीकडे पाहण्याचा प्रयत्न केला. ही घटना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर घडली. व्हिडीओत मुख्यमंत्र्यांच्या गाडीजवळ हे घडल्याचं दिसत आहे. तिथं प्रचंड गर्दी होती. कुठल्याही मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला प्रचंड पोलीस यंत्रणा असते. पोलिसांचा एवढा मोठा ताफा, उत्साही कार्यकर्ते, सहकारी कार्यक्रमाला आले होते.” “जितेंद्र आव्हाड यांनी त्या गर्दीत माझे सहकारी श्रीकांत यांनाही हात लावला आणि बाजूला केलं. तसेच त्यांनी समोरून येणाऱ्या त्या महिलेलाही बाजूला केलं. त्यामुळे नेमका विनयभंग कसा झाला हे कळत नाही. हे गैरसमजातून आणि चुकीच्या संवादातून झालं आहे असं मला वाटतं,” असं मत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलं.
must read
- मोठी बातमी! 72 तासात 2 गुन्हे, आव्हाडांना अटक; रिदा रशिद यांना ढकलणे आलं आव्हाडांच्या आंगलटी
- Recipe : घरातील पार्टी असो किंवा वाढदिवसाची पार्टी, स्टार्टरमध्ये सर्व्ह करण्यासाठी ‘पनीर कबाब’ एकदा करून पहा