मुंबई : आदित्य ठाकरे  बिहार दौऱ्यावर जात आहेत. मुंबईतून पाटण्याकडे निघण्याआधी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना बिहार दौऱ्याचा अजेंडा काय? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर आदित्य ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. आदित्य ठाकरे म्हणाले, “मागील अनेक दिवसांपासून तेजस्वी यादव आणि माझी फोनवर चर्चा सुरू आहे. आधी आमचं महाराष्ट्रात सरकार होतं आणि ते बिहारमध्ये विरोधी पक्षात होते. तेव्हापासून आम्ही एकमेकांशी सल्लामसलत करत असतो. आज पहिल्यांदा आम्ही एकमेकांना भेटू. या भेटीत अनेक विषयांवर चर्चा होईल. यात पर्यावरण, हवामान बदलाचं संकट, उद्योग अशा अनेक विषयांवर चर्चा होईल.”

पुढे ते म्हणाले की  “मला आज सकाळी बातमी कळली की, आजची मंत्रिमंडळाची बैठक रद्द झाली. दुसऱ्या राज्यात प्रचार सुरू आहे म्हणून ही बैठक रद्द करण्यात आली. राज्यात ओला दुष्काळ आहे, बेरोजगारी वाढत आहे, राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. मात्र, या खोके सरकारच्या मंत्रिमंडळाकडे महाराष्ट्रातील प्रश्नांवर बैठक घेण्यासाठी एक तासही नाही,” असं मत व्यक्त करत आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला.

must read

Share.

Leave A Reply

Exit mobile version