म्हणून इन्फोसिसला बसलाय ‘तसला’ झटका..! पहा नेमके काय झालेय या तिमाहीतही
मुंबई : देशातील दुसरी सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान (IT) कंपनी असलेल्या Infosys ने बुधवारी आर्थिक वर्ष 2021-22 च्या शेवटच्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. या तिमाहीत इन्फोसिस सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. या दरम्यान 27.7 टक्के कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला. याशिवाय, ही सलग तिसरी तिमाही आहे ज्यात राजीनामा देणाऱ्यांची संख्या 20 टक्क्यांहून अधिक आहे.
विचारधन | सोडणं तसं सोप्पं.. पण.. | लेखिका हिमांगी हडवळे – नवले | Marat… https://t.co/kY7Gv0lCpu via @YouTube
Advertisement— Krushirang (@krushirang) April 15, 2022
Advertisement
त्यानुसार जानेवारी-मार्च तिमाहीत इन्फोसिसमधून राजीनामा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास 80,000 होती. त्याच वेळी, ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत इन्फोसिसच्या 25.5 टक्के कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडली होती. जुलै-सप्टेंबर तिमाहीत हा आकडा 20.1 टक्के आणि एप्रिल-जून तिमाहीत 13.9 टक्के होता. गेल्या वर्षी जानेवारी ते मार्च या तिमाहीत कंपनी सोडून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचा दर 15.2 टक्के होता. मात्र, केवळ कर्मचारीच कंपनीतून राजीनामा देत आहेत, असे नाही. इन्फोसिसने या काळात मोठ्या प्रमाणात नवीन कर्मचाऱ्यांचीही भरती केली आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात, Infosys ने भारतात आणि जगभरात 85,000 नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली. (Around 80000 Employees Of Infosys Resigned In Last Quarter Of FY 2021 2022 News)
तसेच, कंपनीने आर्थिक वर्ष 2023 मध्ये 50 हजारांहून अधिक फ्रेशर्सची नियुक्ती करण्याची योजना आखली आहे. मार्च 2022 अखेर कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या दोन लाख 97 हजार 859 होती. कोरोनाव्हायरस साथीच्या रोगाचा प्रभाव कमी झाल्यामुळे आयटी क्षेत्रातील कुशल कामगारांची मागणी वाढली आहे. यासाठी कंपन्या अधिक चांगले पॅकेज देत आहेत. याशिवाय, काही अभ्यासांमध्ये असे म्हटले गेले आहे की आता कामापेक्षा वैयक्तिक आयुष्याला अधिक महत्त्व देण्याची भावना निर्माण झाली आहे. यामुळे कामात मनासारखे वातावरण किंवा लवचिकता मिळत नाही, तेव्हा ते नोकरी सोडण्यास मागेपुढे पाहत नाहीत.
म्हणून महाराष्ट्र अंधारात; पहा कोणी केलाय हा काळाकुट्ट कारनामा..! https://t.co/0WrF9TBC8Q
Advertisement— Krushirang (@krushirang) April 16, 2022
Advertisement