राहा तयार..! ‘ही’ टेलिकॉम कंपनी पुन्हा झटका देण्याच्या तयारीत ? ; पहा, कसा होणार परिणाम..?
मुंबई : काही महिन्यांपूर्वी एअरटेलसह जवळपास सर्वच कंपन्यांनी त्यांच्या टॅरिफ प्लॅनच्या किमतीत भरमसाठ वाढ केली होती. आता एअरटेलने या वर्षी पुन्हा दर वाढ करण्याचे संकेत दिले आहेत. प्रति वापरकर्ता सरासरी महसूल (ARPU) 200 रुपयांपर्यंत नेण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी कंपनीने ग्राहकांना आणखी त्रास देण्याचा विचार सुरू केला आहे.
भारती एअरटेल लिमिटेडने बुधवारी सांगितले की, तिसर्या तिमाहीत टॅरिफ वाढ आणि गुगलने केलेल्या गुंतवणुकीमुळे कंपनीच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे. या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 12.6 टक्क्यांनी वाढून 29,867 कोटी रुपये झाले, जे मागील वर्षात याच तिमाहीत 26,518 कोटी रुपये होते. एअरटेलच्या व्यवस्थापनाने सांगितले की प्लॅनची किंमत पुन्हा वाढू शकते. व्यवस्थापनाने सांगितले की, जर दोन ते चार महिन्यांत टॅरिफ प्लॅनमध्ये वाढ झाली नाही, तरी या वर्षाच्या शेवटी वाढ होऊ शकते. व्यवस्थापनाने पुढे सांगितले की कंपनी 2022 मध्ये ARPU (प्रति वापरकर्ता सरासरी महसूल) 200 रुपयांपर्यंत दरमहा करणार असे अपेक्षित आहे.
कंपनीने या तिमाहीत 830 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. तर गेल्या वर्षाच्या तिमाहीत कंपनीला 854 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. तथापि, कंपनीने प्रति ग्राहक सरासरी कमाई (ARPU) मध्ये चांगली कामगिरी केली आहे. तथापि, सुधारित दरांचा संपूर्ण परिणाम चौथ्या तिमाहीत दिसून येईल. भारती एअरटेलवरील कर्जाचा भार आणखी वाढला आहे. डिसेंबर 2021 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीवर 1.59 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे, जे एका वर्षाआधी याच कालावधीत 1.47 लाख कोटी रुपये होते.
दरम्यान, टेलिकॉम कंपन्यांनी एकीकडे त्यांचे प्रीपेड रिचार्ज प्लान दरवाढ केली आहे तर दुसरीकडे विविध प्रकारच्या ऑफर्स आणत आहेत. Airtel आणि Jio ने अशा काही ऑफर आणल्या आहेत, ज्यामध्ये युजर्सना कॅशबॅक देण्यात येत आहेत. चला तर मग जाणून घेऊ या, या दोन कंपन्यांनी कोणत्या ऑफर लाँच केल्या आहेत.
अर्र.. आधी केली दरवाढ आता आणल्यात ‘कॅशबॅक’ ऑफर; ‘एअरटेल’, ‘जिओ’ने ‘अशी’ केलीय आयडीया..