दिल्ली – जगभरातील अनेक देशांत भारताने निर्यातीत वाढ केली असताना मागील काही दिवसांपासून सरकारच्या डोकेदुखीत वाढ करणाऱ्या बातम्या येत आहेत. आता आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत खरेदीदारांनी किटकनाशके आणि रसायने त्यांच्या निश्चित मर्यादेपेक्षा जास्त असल्याने चहा (Tea Powder) परत पाठवला आहे. इंडियन टी एक्सपोर्टर्स असोसिएशन (ITEA) चे अध्यक्ष अंशुमन कनोरिया यांनी ही माहिती दिली. टी बोर्ड ऑफ इंडिया (Tea Board Of India) निर्यातीला (Increase In Tea Export) चालना देण्याचा विचार करत आहे कारण जागतिक चहाच्या बाजारपेठेत श्रीलंका (Sri Lanka) कमकुवत होत आहे, मात्र, खेप नाकारल्यामुळे बाहेरील शिपमेंट कमी होत आहे.
कनेरिया यांनी पीटीआयला सांगितले की, देशात विकल्या जाणार्या सर्व चहाने भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) च्या नियमांचे पालन केले पाहिजे. तथापि, बहुतेक खरेदीदार विलक्षण उच्च रासायनिक सामग्री असलेल्या चहाची खरेदी करत आहेत. कनेरिया यांनी पुढे लक्ष वेधले की कायद्याचे पालन करण्याऐवजी बरेच लोक सरकारला FSSAI निकष अधिक उदार बनवण्याचा आग्रह करत आहेत परंतु ते योग्य ठरणार नाही.
कनोरिया यांनी सांगितले की, अनेक देश चहासाठी कठोर नियम पाळत आहेत. बहुतेक देश EU मानकांचे पालन करतात जे FSSAI नियमांपेक्षा अधिक कठोर आहेत. 2021 मध्ये भारताने 195.90 दशलक्ष किलो चहाची निर्यात केली होती. प्रमुख खरेदीदार कॉमनवेल्थ ऑफ इंडिपेंडंट स्टेट (CIS) देश आणि इराण होते. यावर्षी 300 दशलक्ष किलो चहाची निर्यात करण्याचे बोर्डाचे उद्दिष्ट आहे. भारताने 2021 मध्ये 5,246.89 कोटी रुपयांच्या चहाची निर्यात केली आहे. तुर्कीने 56 हजार 877 टन भारतीय गहू (Wheat) परत केला आहे. भारतीय गव्हात रुबेला विषाणू (Rubella Virus In Indian Wheat) आढळल्याचे कारण तुर्कीने दिले आहे. त्यामुळे गहू परत पाठवले आहेत. त्यामुळे आता सरकारला या गोष्टींचा विचार करण्याची गरज आहे. कारण, काही देशांतील नियम अत्यंत कठोर आहेत. त्यानुसार तयारी करण्याची गरज आहे. असे घडले तरच निर्यातीत आधिक सुधारणा होईल.