मुंबई : महाविकास आघाडी सरकार पडल्यास आणि महाराष्ट्र राज्यात भाजपची सत्ता आल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची काय भूमिका असेल यावर शरद पवार यांनी स्पष्ट भाष्य केले आहे. त्यांनी अशावेळी विरोधात बसण्याची तयारी असल्याचे स्पष्ट म्हटले आहे. दिल्लीतील पत्रकार परिषदेत सध्याच्या राजकीय घडामोडीवर भाष्य करताना ‘हे विशेष गंभीर नाही’ असेच पवारांनी म्हटले आहे. (Sharad Pawar has given a clear commentary on the role of the Nationalist Congress Party (NCP) if the Mahavikas Aghadi government falls and the BJP comes to power in Maharashtra. He has made it clear that he is ready to sit in opposition.)
- पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी मांडलेले मुद्दे असे :
- राज्यसभा किंवा विधान परिषद निवडणुकीत मतविभाजन काही नवीन नाही.
- असे झाल्यास सरकार पडणार किंवा काहीतरी होणार असेच काहीही नाही.
- मुख्यमंत्री कोणाला करायचे हा शिवसेना पक्षाचा अंतर्गत मुद्दा.
- मंत्री शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे याबद्दल काहीही माहित नाही.
- सध्याच्या परिस्थितीवर तोडगा लवकरच निघेल.
- दुपारी मिटिंग असल्याने आताच मुंबईत आज मागे जाणार किंवा नाही याबाबत सांगत नाही.
- महाविकास आघाडी सरकारचे काम चांगले आहे आणि सरकार आणखी टिकेल.
Sharad Pawar Live: MLC निवडणुकीच्या निकालाबाबत म्हटले असे; सरकारच्या स्थिरतेबाबत… https://t.co/T9z4cjVqlJ
— Krushirang (@krushirang) June 21, 2022