मुंबई : गेल्या काही दिवसांत इंधनाचे दर गगणाला भिडल्याने नागरिकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वळला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात दाखल होत असल्याने ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात त्यांची खरेदीही वाढली होती. मात्र, आता मोदी सरकारने इलेक्ट्रिक स्कूटरबाबत धक्कादायक निर्णय घेतला आहे.. त्यामुळे ग्राहकांना ‘जोर का झटका’ बसला आहे..
देशात इलेक्ट्रिक दुचाकींची मागणी वाढत असतानाच, केंद्र सरकरानं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. तो म्हणजे, इलेक्ट्रिक वाहन कंपन्यांना नवीन मॉडेल (दुचाकी) लाँच करण्यास मोदी सरकारने आता बंदी घातलीय.. देशभरात इलेक्ट्रिक स्कूटरला (Electric Scooter) आग लागण्याच्या अनेक घटना गेल्या काही दिवसांत समोर आल्या आहेत. त्यामध्ये आतापर्यंत 3 जणांना आपला जीव गमवावा लागला, तर अनेक जण गंभीर जखमी झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारनं गंभीर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या ई-दुचाकी विकण्यासाठी मात्र कोणतेही बंधन नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय.
रस्ते वाहतूक मंत्रालयाने दिल्लीत नुकतीच एक बैठक झाली. त्यात केंद्र सरकारने इलेक्ट्रिक दुचाकींच्या सुरक्षेच्या विषयांवर चर्चा केली. त्यानंतर नव्या इलेक्ट्रिक दुचाकी लॉन्च करण्यास कंपन्यांवर बंदी घालण्याच्या निर्णय घेण्यात आला.. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांसाठी हा धक्कादायक निर्णय असल्याचे मानले जात आहे..
दरम्यान, केंद्र सरकारनं नव्या इलेक्ट्रिक दुचाकी लॉन्च करण्यास बंदी घातली असली, तरी सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या दुचाकी विकण्यासाठी कोणतीही बंधने नाहीत. सध्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या, याआधी विक्री झालेल्या दुचाकींची तपासणी करण्याच्या सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संबंधित कंपन्यांना केल्या आहेत. गडकरी यांच्या सूचनेनंतर अनेक कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक दुचाकी तपासणीसाठी माघारी बोलवल्या आहेत.
इलेक्ट्रिक स्कूटरला लागलेल्या आगीच्या घटनांची चौकशी करण्यासाठी, तसेच त्यावर उपाययोजनांबाबत शिफारसी करण्यासाठी सरकारनं तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे. समितीच्या अहवालाच्या आधारे, संबंधित कंपन्यांना आवश्यक ते आदेश दिले जातील.. लवकरच इलेक्ट्रिक वाहनांसाठी गुणवत्ता-केंद्रित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जाणार आहेत. कोणत्याही कंपनीनं त्यांच्या प्रक्रियेत निष्काळजीपणा केल्यास मोठा दंड आकारला जाईल. सर्व सदोष वाहने परत बोलावण्याचे आदेशही दिले जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आमचे सरकार प्रत्येक प्रवाशांची सुरक्षेसाठी वचनबद्ध असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे..
कडाक्याच्या उन्हाळ्याने सरकारलाही फोडलाय घाम..’तिथे’ विजेच्या वापराने मोडलेत सगळेच रेकॉर्ड..
मंत्र्यांना आणखी एक झटका..! जास्त किंमतीचे ‘गिफ्ट’ घेतले तर.. पहा, काय आहे सरकारचा निर्णय..