मुंबई : राज्यात थकीत वीजबिलाचा आकडा दिवसेंदिवस फुगतच चालला आहे.. वीजबिलाची वसुली होत नसल्याने महावितरणचा तोटा वाढत चालला आहे.. नागरिकांनी वीजबिल भरावे, यासाठी ठाकरे सरकारकडून सातत्याने विविध सवलती दिल्या जातात. मात्र, त्यानंतरही वीजबिलाची वसुली होत नसल्याचे दिसते.. हा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा पुढाकार घेतला आहे. थकीत वीज बिलाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी नुकतीच मोठी घोषणा केलीय. त्यामुळे राज्यातील वीजबिलाची वसूली तर होईलच, शिवाय ग्राहकांचाही मोठा फायदा होणार असल्याचे सांगण्यात येते..
मंत्री राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, की वीज ग्राहकांनी एक रकमी थकबाकी भरल्यास सर्व व्याज आणि विलंब शुल्क माफ करण्यात येणार आहे. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नावाने ही नवी योजना जाहीर करण्यात आली आहे. ‘विलासराव देशमुख अभय योजना’ असे या याेजनेचे नाव असल्याचे मंत्री राऊत यांनी जाहीर केले.
सोबतच उच्च दाब वीज ग्राहकांनी एक रकमी वीजबिल भरल्यास 5 टक्के रक्कम माफ करण्यात येणार आहे. तसेच लघु दाब वीज ग्राहकांनी एक रकमी वीज बिल भरल्यास 10 टक्के रकम माफ केली जाणार असल्याचे मंत्री राऊत यांनी जाहीर केले. अर्थात, या योजनेचा कृषिपंप ग्राहकांना लाभ होणार नसल्याचे सांगण्यात आले..
महावितरणची आर्थिक परिस्थिती सध्या अत्यंत बिकट आहे. या बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी 9 हजार कोटी रुपयांची थकबाकी असणाऱ्या कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांकंडील थकबाकी वसुलीसाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ही योजना जाहीर केली आहे.. या योजनेचा लाभ घेतल्यास ग्राहकांना 1 हजार 445 कोटी रुपयांची सवलत मिळणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.
Russia-Ukrain crisis: फक्त रशियालाच नाही जगालाही फटका; पहा निर्बंधांमुळे नेमके काय होईल ते
Russia-Ukraine war : पहा नेमके काय चालू आहे युद्धमैदानात; रशियाने लावले ‘तसेही’ डोके