Sachin Pilot Protest : राजस्थान काँग्रेसचे (Rajasthan Congress) नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलटने (Sachin Pilot) आपल्याच सरकारविरोधात शड्डू ठोकला आहे. मागील वसुंधरा राजे यांच्या नेतृत्वा भाजप सरकारच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराविरोधातील कारवाईसाठी पायलट आज एक दिवसीय उपोषण करणार आहेत. पायलट लवकरच जयपूर शहरातील हुतात्मा स्मारकासमोर उपोषाणाला बसणार आहेत. त्यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी काँग्रेसने भरपूर प्रयत्न केले. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. पायलट आपल्या उपोषणावर ठाम राहिले.
गेहलोत यांच्याशी संघर्ष
काँग्रेस नेते सचिन पायलट यांचे हे उपोषण राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांच्या विरोधात मानले जात आहे. वास्तविक, पायलट यांनी यापूर्वी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, भ्रष्टाचारावर कारवाईसाठी गेल्या दोन वर्षांपासून मुख्यमंत्र्यांना अनेक पत्रे लिहिली आहेत. ते म्हणाले की, भाजपच्या राजवटीत अनेक घोटाळे झाले आणि त्यामुळेच आमचे सरकार स्थापन झाले, मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.
पायलट म्हणाले की, मला राज्यातून भ्रष्टाचार संपवायचा आहे आणि त्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या मागणीसाठी आज उपोषण करत असल्याचे काँग्रेस नेत्याने सांगितले. पायलटच्या उपोषणावरून भाजपने काँग्रेसवरही निशाणा साधला आहे. राजस्थान विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते राजेंद्र राठोड म्हणाले की, सचिन पायलट हे पक्ष नेतृत्वाला खुलेआम आव्हान देत आहेत. त्यांचे दिवसभराचे उपोषण काँग्रेस सरकारसाठी त्रासदायक ठरणार आहे. ते म्हणाले की, देशभरात काँग्रेसची पकड सुटली आहे.
दरम्यान, राजस्थानमध्ये सचिन पायलट यांच्या आक्रमकतेला रोखण्याच्या प्रयत्नात असताना काँग्रेस (Rajasthan Congress) आता पूर्णपणे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांच्या पाठिशी असल्याचे दिसत आहे. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी गेहलोत यांना राजकीयदृष्ट्या कमकुवत करण्याचा कोणताही धोका पक्ष काँग्रेस श्रेष्ठी घेऊ शकत नाही.
दुसरीकडे, सचिन पायलट (Sachin Pilot) राजस्थानमधील आपल्याच काँग्रेस सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित करत एकदिवसीय उपोषणावर ठाम आहेत. त्यावरून त्यांनी गेहलोत यांच्याशी लढण्याची जवळपास पूर्ण तयारी केल्याचे स्पष्ट होत आहे.
गेहलोत यांच्या पाठीशी उभे राहून केंद्रीय नेतृत्वाने निर्णय पायलट यांनाच घ्यावा लागेल, असा संदेश दिला आहे. मात्र त्यांना रोखण्यासाठीही पक्षाचे प्रयत्न सुरू आहेत. असे असले तरी आता पायलट आता शांत होतील याचीही शक्यता कमीच दिसत आहे.
पक्ष नेतृत्वाच्या वतीने संघटनेचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल आणि राज्याचे काँग्रेस प्रभारी सुखजिंदर सिंग रंधावा मुख्यमंत्री गेहलोत आणि पायलट यांच्याशी राजस्थान काँग्रेसमधील निर्माण झालेली गळती थांबवण्यासाठी चर्चा करत आहेत. उपोषणाला चुकीचे ठरवून रंधावा यांनी सचिन पायलट यांना नेतृत्वाच्या दृष्टिकोनाचा स्पष्ट संदेश दिला आहे.
सरकार पाडण्याचे षडयंत्र रचले
काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा म्हणाले की, राजस्थानमध्ये पक्षाचे संकट वाढत असल्याची भीती असताना गेहलोत यांच्यावर पायलटचा हल्ला रोखून गेहलोत सरकार भ्रष्टाचाराविरोधात काम करत नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. पायलट यांनी माजी मुख्यमंत्री वसंधुरा राजे यांच्याविरोधातील भ्रष्टाचाराच्या तक्रारींवर कारवाई केली जात नसल्याचा आरोप केला होता.
पत्रकार परिषदेत याबाबत विचारले असता खेडा म्हणाले की, राजस्थान भाजपचे ज्येष्ठ नेते गजेंद्र सिंह शेखावत यांच्याविरोधात संजीवनी घोटाळ्याची चौकशी सुरू आहे आणि त्यामुळेच शेखावत यांनी गेहलोत यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला आहे. त्यानुसार येत्या काही दिवसांत त्यांच्या तपास अहवालाच्या आधारे कारवाईही केली जाईल. राजस्थानमध्ये आमचे निवडून आलेले सरकार पाडण्याचा डाव भाजपने कसा रचला आणि आमचे आमदार विकत घेण्याचा प्रयत्न कसा केला, याचाही तपास सुरू असल्याचे खेडा यांनी सांगितले.
काँग्रेस प्रवक्त्याची ही टिप्पणी थेट पायलट यांच्याकडे निर्देश करणारी आहे. ज्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या 18 आमदारांनी बंड करण्याचा प्रयत्न केला. पायलटच्या जाहीर वक्तव्याशी नेतृत्वाच्या असहमतीचा संदेश देत खेडा म्हणाले की, कोणाची काही तक्रार असल्यास ती एआयसीसी प्रभारींच्या निदर्शनास आणून द्यावी. राजस्थान काँग्रेसचे प्रभारी रंधावा यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, पायलटने अशाप्रकारे पत्रकार परिषद घेणे योग्य नाही आणि त्यांनी हा मुद्दा आधी त्यांच्याकडे स्पष्ट करायला हवा होता.