IPL : मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल (IPL) क्वालिफायर-2 मध्ये पोहोचला आहे. उद्या शुक्रवारी (२६ मे) गतविजेत्या गुजरात टायटन्सशी सामना होईल. साखळी फेरी संपल्यानंतर मुंबईचा संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर होता. तो तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्ध एलिमिनेटरमध्ये खेळणार होता. मुंबईने अंतिम फेरी गाठण्याचा पहिला अडथळा पार केला आणि एलिमिनेटरमध्ये लखनऊ पराभव केला.
मुंबई आतापर्यंत पाच वेळा चॅम्पियन बनली आहे. सहाव्यांदा जेतेपद पटकावण्याकडे त्यांचे लक्ष लागले आहे. अंतिम फेरी गाठण्यासाठी गुजरातवर मात करावी लागेल. या स्पर्धेत दोन्ही संघ तिसऱ्यांदा आमनेसामने असतील. मुंबईने एक सामना तर गुजरातने एक सामना जिंकला आहे. त्यांचा गुजरातविरुद्धचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. मुंबईने तीनपैकी दोन सामने जिंकले असून एका सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
मुंबईचा संघ किती वेळा फायनल खेळला?
मुंबईचा संघ सहा वेळा अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्याला पाच वेळा यश मिळाले आहे. 2010 मध्ये मुंबई पहिल्यांदा फायनल खेळली होती. त्यानंतर त्याला चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. तेव्हापासून, मुंबई संघाने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये अंतिम फेरी गाठली आणि प्रत्येक वेळी विजय मिळवला. सातव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश करण्यापासून संघ एक पाऊल दूर आहे.
क्वालिफायर-2 मध्ये मुंबईचा रेकॉर्ड कसा आहे?
2011 मध्ये आयपीएलमध्ये प्लेऑफ फॉर्मेट सादर करण्यात आला होता. तेव्हापासून मुंबई संघ तीन वेळा क्वालिफायर-२ मध्ये खेळला आहे. त्याचा या फेरीतील रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. त्याने क्वालिफायर-2 मध्ये दोनदा विजय मिळवला आहे. एकदा संघाला पराभव स्वीकारावा लागला आहे.
चेन्नई विरोधात सामना होईल का?
मुंबईचा संघ गुजरातचा पराभव करण्यात यशस्वी ठरला तर आयपीएलच्या अंतिम फेरी जागा मिळेल. आता आपल्या उत्कृष्ट विक्रमाच्या जोरावर मुंबई अंतिम फेरीत पोहोचते की नाही हे पाहावे लागेल. अंतिम फेरीत पोहोचल्यास पुन्हा एकदा रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यात स्पर्धा पाहायला मिळणार आहे.