Indian Railways : तुम्हीही रेल्वेने (Railway) प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. भारतीय रेल्वे (Indian railways) प्रवाशांच्या सोयीसाठी वेळोवेळी सुविधा देत असते. अलीकडेच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Railway minister ashwini vaishnav) यांनी खजुराहो ते दिल्ली वंदे भारत ट्रेन (vande Bharat train) सुरू करण्याची घोषणा केली. यादरम्यान रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, छतरपूर आणि खजुराहोमध्ये रेक पॉइंट मंजूर करण्यात आले आहेत.
द्राक्ष म्हणजे अहा..हा.. भन्नाट आंबट-गोड अन् चवदार..
🍇🍇🍇🍇
द्राक्ष बागायतदार संघाच्या अधिवेशनात सहभागी होऊन वाढवा शेतीचा गोडवा..#द्राक्ष #grapes pic.twitter.com/nUCYFFJZtb— Krushirang (@krushirang) August 26, 2022
75 शहरांना वंदे भारतशी जोडण्याची योजना
विशेष म्हणजे सरकारने देशातील 75 शहरांना वंदे भारत ट्रेनने जोडण्याची योजना आखली आहे. यासाठी इंटिग्रल, चेन्नई (ICF Chennai) येथे वेगाने तयारी सुरू आहे. आणखी 75 वंदे भारत ट्रेनचे डबे तयार केले जात आहेत, जे लवकरच तयार होतील. इतकेच नाही तर नवीन डबे जुन्या मॉडेलच्या तुलनेत खूप प्रगत असतील. प्रवाशांच्या सोयीनुसार ते अधिक सुसज्ज करण्यात येत आहे.
टेस्टिंग सूरु
वंदे भारत ट्रेनची ट्रायलही सुरू झाली आहे. याअंतर्गत वंदे भारत ट्रेन चेन्नईहून चंदीगडला नेण्यात आली. जिथे त्याच्या अनेक फेज चाचण्या चालू आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की ही ट्रेन अत्यंत किफायतशीर बनवण्यात आली आहे, ज्यासाठी तिची उच्चस्तरीय चाचणी सुरू आहे. रेल्वेमंत्र्यांच्या या घोषणेनंतर रेल्वे प्रवाशांनी सोशल मीडियावर (Social media) त्यांचे आभार मानले असून रेल्वेमंत्र्यांनी मन जिंकल्याचे सांगितले आहे.
Business Idea : फक्त 15 हजारात सुरू करा ‘हा’ व्यवसाय अन् कमवा 1 लाखांहून अधिक रूपये; पटकन करा चेक https://t.co/Bego3XLGwP
— Krushirang (@krushirang) August 27, 2022
खजुराहो होणार जागतिक दर्जाचे स्टेशन
कार्यक्रमादरम्यान रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खजुराहो स्थानकाच्या पुनर्विकासाबाबतही चर्चा केली. हे स्थानक जागतिक दर्जाचे केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. एक स्टेशन, एक उत्पादन योजनेचाही विस्तार केला जात आहे. यामागे स्थानकांच्या माध्यमातून स्थानिक उत्पादनांची विक्री करता येणार आहे, म्हणजेच खजुराहोचा प्रवास प्रवाशांसाठी अतिशय सोपा होणार आहे. कार्यक्रमादरम्यान रेल्वे मंत्र्यांच्या या निर्णयाने खूश होत रेल्वेने प्रवास करणारे प्रवासी म्हणाले रेल्वेमंत्र्यांनी मन जिंकले आहे.