दिल्ली – देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) ब्लॅकआऊटचा (Black Out) धोका निर्माण झाला आहे. दिल्लीला वीजपुरवठा (Power crisis) करणाऱ्या बहुतांश वीज प्रकल्पांमध्ये कोळशाची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. ज्या प्लांटमध्ये किमान 21 दिवसांचा कोळसा असावा, त्या प्लांटमध्ये फक्त एक दिवस कोळसा शिल्लक राहतो. मिळालेल्या माहितीनुसार, कोळशाच्या कमतरतेमुळे केवळ दिल्लीच नाही तर 12 राज्यांमध्ये वीज संकट आहे.
मेट्रो ट्रेन-रुग्णालयांना वीजटंचाईचा सामना करावा लागू शकतो
दरम्यान, कोळशाच्या पुरवठ्यात आणखी विलंब झाल्यास मेट्रो ट्रेन आणि रुग्णालयांना वीज पुरवण्यात अडचण येऊ शकते, असा इशारा दिल्ली सरकारने दिला आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत दिल्लीचे ऊर्जामंत्री सत्येंद्र जैन यांनी परिस्थितीबाबत तातडीची बैठक बोलावली. दादरी, उंचाहर, कहलगाव, फरक्का आणि झज्जर पॉवर प्लांटमधून दररोज 1,751 मेगावॅट वीज दिल्लीला पाठवली जाते. मात्र या सर्व वीज प्रकल्पांमध्ये कोळशाचा तुटवडा आहे.
आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा
मंत्री सत्येंद्र जैन यांनी हे कारण सांगितले
दिल्ली सरकारचे ऊर्जा मंत्री सत्येंद्र जैन म्हणाले की, संपूर्ण देशात कोळशाची तीव्र टंचाई आहे. रेल्वे रेकची कमी उपलब्धता हे याचे सर्वात मोठे कारण असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय कोळशाचाही तुटवडा आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील वीज प्रकल्पांमध्ये कोळशाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. ते म्हणाले की आमच्याकडे कोणताही बॅकअप नाही.
वीजही साठवता येत नाही. दररोज वीजनिर्मिती होते. ते म्हणाले की, कोळशापासून वीज बनवायची असेल तर 21 दिवसांचा कोळसा बॅकअप असावा. पण एनटीपीसी दादरी आणि एनटीपीसी उंचाहारमध्ये फक्त 1 दिवसाचा कोळसा शिल्लक आहे. दिल्लीचे ऊर्जामंत्री सत्येंद्र जैन यांनी दिल्लीचे कोणतेही पेमेंट बाकी नसल्याचे स्पष्ट केले. आम्ही पैसे दिले आहेत. मात्र, एनटीपीसीने सत्येंद्र जैन यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.