मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना नेपियरच्या मॅक्लिन पार्कवर खेळला जात आहे. न्यूझीलंडचा कर्णधार टीम साऊदीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया प्रथम गोलंदाजी करेल. नेपियरमध्ये पाऊस थांबला आहे. 3 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 1-0 ने पुढे आहे. न्यूझीलंडची फलंदाजी सुरू झाली आहे.
फिन ऍलन आणि डेव्हन कॉनवे न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात करण्यासाठी आले होती. भारताच्या गोलंदाजीची सुरुवात अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार यांनी केली. त्यांनतर आलेल्या युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने सलामीवीर फिन ऍलनला बाद करून किवी संघाला सुरुवातीचा धक्का दिला आहे. डावाच्या दुसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अॅलनला अर्शदीपने एलबीडब्ल्यू आऊट केले. अॅलन 4 चेंडूत 3 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. किवी संघाने 4 षटकात एक विकेट गमावत 30 धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर चैपमैन हा फलंदाजीसाठी आला आहे. डेव्हन कॉनवे यावेळी चांगल्या लयात दिसत आहे.
- हेही वाचा:
- न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या टी 20 सामन्यात पाऊस पडल्यास भारताच्या ताब्यात असेल मालिका; जाणून घ्या नेपियरमध्ये कसे असेल हवामान
- न्यूझीलंडचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय; भारत टी 20 मालिका जिंकण्याच्या इराद्याने उतरणार मैदानात