नवी दिल्ली : नैऋत्य मोसमी पावसाने महाराष्ट्राची राजधानी मुंबई (Mumbai) आणि इतर आसपासच्या भागात दणका दिला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) शनिवारी ही घोषणा केली. पुढील 3 ते 4 तासांत ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मुंबई जिल्ह्यांत काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळ पडण्याची शक्यता आहे. यासोबतच या काळात ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
मुंबईत शुक्रवारी मोसमातील सर्वात मोठा मान्सूनपूर्व पाऊस झाला. मुंबईच्या दक्षिण भागात मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली. IMD च्या म्हणण्यानुसार, नैऋत्य मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल आहे कारण सुमारे एक आठवड्याच्या संथ प्रगतीनंतर त्याने वेग घेतला आहे.
आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा
या भागात मान्सून वाढण्याची शक्यता
IMD च्या अंदाजानुसार, “मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, गोवा, दक्षिण महाराष्ट्राचा काही भाग, कर्नाटकचा आणखी काही भाग, तामिळनाडूचा काही भाग, दक्षिण आंध्र प्रदेशचा काही भाग, पश्चिमेच्या आणखी काही भागात मासून पुढे सरकला आहे. परिस्थिती वाढीसाठी अनुकूल आहे.”
दरम्यान, IMD ने 10-11 जून रोजी अरुणाचल प्रदेशात आणि पुढील पाच दिवसांत आसाम आणि मेघालयात अत्यंत मुसळधार पावसाचा (204.5 मिमी पेक्षा जास्त) इशारा दिला आहे. विशेष म्हणजे, देशातील वार्षिक पावसापैकी 70 टक्के पाऊस हा मान्सून वाऱ्यांमुळे येतो आणि तो कृषी आधारित अर्थव्यवस्थेसाठी जीवनरेखा मानला जातो.