Corona : देशातील कोरोना बाधितांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. आरोग्य मंत्रालयाने बुधवारी (17 ऑगस्ट) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 9,062 नवीन रुग्ण (Corona Patient) आढळले आहेत, जे कालच्या तुलनेत 249 अधिक आहेत. त्याच वेळी 36 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. कालच्या आकडेवारीत 8,813 प्रकरणे नोंदवली गेली आणि 29 रुग्णांचा मृत्यू झाला. देशात अॅक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या 1,05,058 वर गेली आहे जी कालच्या तुलनेत 6,194 कमी आहे. साथरोगाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण 5,27,134 लोकांचा मृत्यू झाला आहे.
दिल्लीतील (Delhi) रुग्णालयांमध्ये कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. या दरम्यान रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढल्याचे समोर आले आहे. दिल्लीच्या उपराज्यपालांनी लोकांना इशारा दिला आहे की, कोरोना अजून संपला आहे असा विचार करू नका. मी सर्वांना आवाहन करतो की, कोविड (Covid) प्रतिबंधात्मक काटेकोरपणे पालन करावे. दिल्लीत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 917 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर या कालावधीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. संसर्ग दर 19.20 टक्के नोंदवला गेला आहे.
महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या 24 तासांत कोरोनाचे 836 नवे रुग्ण आढळले आहेत. आजाराच्या सुरुवातीपासून राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 80,74,365 झाली आहे, तर एकूण मृतांची संख्या 1,48,174 वर पोहोचली आहे. दुसरीकडे मुंबईमध्ये (Mumbai) गेल्या 24 तासांत कोरोनाचे 332 रुग्ण आढळून आले असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, हा घातक आजार अजून संपलेला नाही. सध्या कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळे रुग्ण सापडत आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याची गरज आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. नागरिक नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष करत आहेत.