मुंबई :
मिनी लॉकडाऊन लागू केल्यानंतर राज्यभरात विरोधाचा सूर उमटला आहे. केंद्र सरकारच्या लॉकडाऊनला संपूर्ण सहकार्य करणाऱ्या व्यापारी मंडळींचा आता आर्थिकदृष्ट्या तोल ढळलेला असल्याने हा विरोध आहे. त्यातच रुग्णसंख्या वाढत असताना विरोधी पक्ष असलेल्या भाजपने राजकीय डाव खेळल्याची टीका होत आहे. केंद्राकडून लस आणि इतर मदत कमी मिळत आहे. त्यानिमित्ताने ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जनतेला आवाहन केले आहे.
त्यांनी म्हटले आहे की, कोरोना रुग्णांची वाढती लोकसंख्या ही चिंताजनक बाब आहे. डॉक्टर, परिचारक, आरोग्य कर्मचारी अहोरात्र कष्ट घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवत आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारला काही कठोर निर्बंध लागू करावे लागत आहेत. केंद्र सरकारही या संबंधी आग्रही आहे. सगळ्या राजकीय नेत्यांना, प्रसारमाध्यमांना, सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या घटकांना माझी आग्रहाची विनंती आहे की परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य सरकारच्या प्रयत्नात आपले सहकार्य असू द्या.
महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस, सर्व घटक अशा संकटाच्या काळात बाकीच्या सर्व गोष्टी बाजूला ठेवून हिमतीने सामोरं जाण्यासाठी यंत्रणेला सहकार्य देतील याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. या सामुदायिक प्रयत्नांतून आपण कोरोनावर निश्चित मात करू आणि या संकटातून नागरिकांची सुटका करू, असेही त्यांनी म्हटलेले आहे.
संपादन : विनोद सूर्यवंशी
कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..
- अहमदनगर सर्वेक्षण : अशी आहे विकासकामाबाबतची कॉमन भावना; पहा कोण आहे विकाससम्राट..!
- कोविड ज्ञान : ऑक्सिजनचा वापर आणि करोना कोणत्या ठिकाणी पसरतो, याची माहिती नक्की वाचा
- म्हणून रात्री झोपण्याअगोदर प्यायचा असतो गुळ; पहा कोणते फायदे होतात या सध्या गोष्टीमुळे
- या 5 गोष्टी खा आणि उन्हाळ्यात वजन कमी करा; ‘चरबीवान’ मंडळींसाठी आहे ही खास माहिती
- IPL 2021 : दिल्ली कॅपिटल Vs पंजाब किंग्जचे संघ भिडणार; पहा काय असेल प्लेइंग इलेव्हनची लिस्ट