सांगली / कोल्हापूर :
महसूल विभाग म्हणजे कामापेक्षा इतर मुद्द्यांवर चर्चेत राहणारा विभाग. कारण, इथे नागरिकांची कामे होण्यापेक्षा अडकून ठेवण्याची स्पर्धा असते. मात्र, आता सांगली जिल्ह्यातील एका धक्कादायक प्रकरणाने हा विभाग चर्चेत आलेला आहे. कारण, एका प्रांताधिकारी महोदयांनी चक्क तिघा तलाठ्यांना बेदम मारहाण केली आहे.
तलाठी संघटना याप्रकरणी आक्रमक झाली आहे. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, सोमवारी सायंकाळी प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी तलाठी अविनाश पाटील, अमर साळुंखे व महादेव वंजारी या तिघांना फोन करून बोलावून घेतले. साहेबांच्या सुचानेनुसार तिघेही कार्यालयात पोहोचले.
प्रांत कार्यालयात पाटील यांनी या तिघांना त्यांच्या दालनात बोलावून घेतले. त्यानंतर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, असे निवेदनात म्हटले आहे. मात्र, यातील मुख्य मुद्द्यावर कोणीही बोललेले नाही. तो मुद्दा म्हणजे प्रांत साहेबांनी नेमक्या कोणत्या मुद्द्यावर तलाठी कर्मचाऱ्यांना मारहाण केली आहे.
संपादन : सचिन पाटील
- आयपीएल २०२१ : गोविंदाच्या जावयाची तुफानी खेळी; शाहरुखच्या केकेआरकडून घालतोय धुमाकूळ
- आयपीएल २०२१ : सेहवाग म्हणतो हैदराबादच्या पराभवासाठी ‘हा’ खेळाडू जबाबदार..!
- महत्वाची आठवण : लाराने आजच्या दिवशीच ‘त्यांच्या’विरोधात ठोकल्या होत्या विश्वविक्रमी ४०० धावा..!
- जेव्हा केकेआरच्या ‘त्या’ खेळाडूची पत्नी राशिदला म्हणाली ‘मॅच आम्ही जिंकणार’; वाचा भन्नाट किस्सा
- पाकिस्तानच्या माजी खेळाडूने कोहलीला बाबरकडून ‘ही’ गोष्ट शिकण्याचा दिला सल्ला