पुणे :
बारामती येथे आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकीय मुद्द्यावर भूमिका मांडली आहे. त्यांनी फ़क़्त एकट्या आसाम राज्यात पुन्हा भाजप सत्तेत येण्याची शक्यता असून इतर ठिकाणी भाजपला खूप कमी प्रमाणात यश मिळेल असे सुतोवाच केले आहे.
त्यांनी म्हटले आहे की, निवडणूकांबाबत आज बोलणे अवघड आहे, पण जनता योग्य निर्णय घेत असते. आसाममध्ये भाजपाचे राज्य आहे. तिथे त्यांची तुलनात्मक स्थिती चांगली आहे. मात्र, इतरत्र त्यांना यश मिळण्याची तितकी शक्यता नाही.
तमिळनाडूतील जनतेचा कौल स्टॅलिन व डीएमके यांच्या बाजूने असेल, तर केरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह डावे यांच्या आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल. भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता ही एकटी भगिनी आपल्या राज्यातील लोकांसाठी संघर्ष करत असल्याने जनता त्यांनाच पुन्हा सत्तेमध्ये संधी देईल अशी शक्यता पवारांनी व्यक्त केली आहे.
संपादन : संतोष वाघ
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- बाब्बो.. सेवांच्या नावाखाली गरिबांच्या खिशात हात; पहा बँकांनी कसे लुटलेय आपल्याला..!
- शेळीपालन : लसीकरणाचे वेळापत्रक नक्की फॉलो करा; वाचा आणि अंमलबजावणीही करा
- शिक्षक-विद्यार्थी सर्वेक्षणातून पुढे आले ‘हे’ 5 मुद्दे; दहावी-बारावीची परीक्षा जूनमध्ये घेण्याची मागणी
- ‘त्यांच्या’सह अदानीही करणार ‘रिटेल क्रांती’; अमेझॉन, रिलायन्सपुढील आव्हाने वाढणार..!
- आयपीएल २०२१ : गोविंदाच्या जावयाची तुफानी खेळी; शाहरुखच्या केकेआरकडून घालतोय धुमाकूळ