अहमदनगर :
जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी आणि मुख्य सदस्य यांच्यात विसंवाद असल्याची चर्चा सुरू आहे. स्थायी समितीच्या बैठकीला अनुपस्थित राहून सभापती आणि सदस्य यांनी अध्यक्षांच्या निधी वाटपावरील नाराजी स्पष्ट केली केली होती. मात्र, आता त्यांनीच सरावासराव सुरू केली आहे.
जिल्हा परिषदेतील सत्ताधारी राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना व क्रांतिकारी शेतकरी पक्ष यांच्यात विकासकामे व निधीवाटपावरून मतभेद निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे. प्रशासकीय सूत्र आणि राजकीय गोटातील मंडळींनी अनेकदा खासगीत पत्रकारांना याबाबत सांगितले आहे. त्याचीच झलक स्थायी समितीच्या बैठकीत दिसली.
जिल्हा परिषदेच्या कार्यालयात उपस्थित असूनही अनेकांनी बैठकीला अनुपस्थित राहून आपली नाराजी उघड केली होती. त्यावर बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते यांनी गुरूवारी भूमिका स्पष्ट केली आहे.
‘आमच्यात कुठेच काही बिघडलेले नाही. आमच्यात समन्वय आहे’, असेच सभापती दाते यांनी म्हटले आहे. ‘पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय नाही, असा जावईशोध कोणी लावला’ असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे.
बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेवर विषय समितीच्या चारही सभापतींनी बहिष्कार घातला होता. त्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली होती. अखेरीस पुन्हा एकदा त्यावर पडदा पडणार असेच दाते यांनी सूचित केले आहे.
संपादन : सचिन मोहन चोभे
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- कोविड ज्ञान : ऑक्सिजनचा वापर आणि करोना कोणत्या ठिकाणी पसरतो, याची माहिती नक्की वाचा
- म्हणून रात्री झोपण्याअगोदर प्यायचा असतो गुळ; पहा कोणते फायदे होतात या सध्या गोष्टीमुळे
- या 5 गोष्टी खा आणि उन्हाळ्यात वजन कमी करा; ‘चरबीवान’ मंडळींसाठी आहे ही खास माहिती
- IPL 2021 : दिल्ली कॅपिटल Vs पंजाब किंग्जचे संघ भिडणार; पहा काय असेल प्लेइंग इलेव्हनची लिस्ट
- IPL 2021 : मॉर्गनसमोर असेल कोहलीचे आव्हान; पहा संभाव्य प्लेइंग इलेव्हन कोण ते