औरंगाबाद :
जयभीम फेस्टीव्हल मध्ये शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांची प्रकट मुलाखत झाली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाषी भाष्य केले. यावेळी त्यांनी ‘ कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीए आघाडीची आता फेररचना करण्याची गरज असून शरद पवार यांच्या सारख्या नेत्यांकडे युपीए आघाडीचे नेतृत्व देण्याची गरज आहे’, असे मत व्यक्त केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आज युपीए आघाडीत काही पक्ष उरलेले असले तरी अन्य प्रादेशिक पक्ष कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली या आघाडीत काम करण्यास तयार नाहीत. त्यामुळे पवारांसारख्या नेत्यांकडे या आघाडीचे नेतृत्व दिल्यास या आघाडीची ताकद वाढण्यास मदत होऊ शकते.
यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून काही अपेक्षाही व्यक्त केल्या. ते म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत येऊन राष्ट्रीय स्तरावर राजकारण केले पाहिजे. अनेक प्रादेशिक पक्षांना आणि अन्य पक्षांनाही आता नवीन नेतृत्व हवे आहे. हे नेतृत्व आता महाराष्ट्रच देऊ शकतो.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- ‘त्या’ महत्वाच्या समिती स्थापनेलाच कोलदांडा; सरपंच उदासीन, तर राज्य सरकारही निरुत्साही..!
- म्हणून शेअर बाजारात तेजी; पहा सेन्सेक्स, निफ्टीची काय स्थिती
- अहमदनगर सर्वेक्षण : ‘झेडपी’बाबत नागरिकांचे आहे ‘हे’ मत; पंचायत समितीबाबत म्हटले जातेय ‘असे’..!
- बाब्बो.. भयंकरच की..; योगीराज्यात करोना तपासणीचे ‘असे’ आहे वास्तव; पहा NBT च्या ग्राउंड रिपोर्टचे मुद्दे
- अशी घ्या काळजी; मोबाईलमध्ये ‘ही’ माहिती ठेवाल, तर बँक खातं होईल झटक्यात खाली..!