मुंबई :
राज्यातील काही जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे लॉकडाऊन आणि कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यातील करोनाचे प्रमाण पुन्हा लक्षणीयरित्या वाढत आहे ही काळजीची बाब असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
त्यामुळे हे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी यापुढील काळात सार्वजनिक स्वरूपातील राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. अशातच कालपासून अमरावतीमध्येही लॉकडाउन पडणार असल्याचे समजत आहेत.
अमरावती शहरात पुन्हा लाॅकडाऊन लागू होणार असल्याने सर्वच वस्तू खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचे दिसत आहे. दारू घेण्यासाठी दारूच्या दुकानासमोरही नागरिकांनी मोठ्या रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.
पुन्हा एकदा ‘उठ बेवड्या जागा हो, अर्थव्यवस्थेचा धागा हो’, असे म्हणत तळीरामांनी दारूच्या दुकानासमोर रांगा लावायला सुरुवात केली आहे. दारूच्या दुकाणासमोर रांगा, माॅलमध्ये गर्दी तसेच बस स्थानकातही मोठी गर्दी झाली आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज रात्री आठ वाजतापासून अमरावती आणि अचलपूर शहरात लाॅकडाऊनची घोषणा केलीय. पुढील सात दिवस कडेकोट लाॅकडाऊन पाळला जाणार आहे.
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार उचलणार ‘ते’ पाऊल; बघा, नेमकं काय म्हणालेत अशोक चव्हाण
- कोलकाताच्या ‘या’ दुकानात 1 चहा मिळतोय हजार रुपयाला; जाणून घ्या काय आहे या चहाची खासियत
- अर्थसंकल्पानंतर ‘या’ शेअर्सने भरले गुंतवणुकदारांचे खिसे; एका महिन्यात दिला तब्बल 150% परतावा
- रॉम्पस+ ईव्ही स्कूटर या पॉवरफुल सायकलबद्दल आहे का तुम्हाला ‘ही’ माहिती; वाचा की मग महत्वाची माहिती
- म्हणून ‘त्यावेळी’ तपासली होती युवराजची बॅट; पहा कोणी आणि का केले होते असे कृत्य