मुंबई :
देशभरात सध्या करोना विषाणूची लाट आलेली आहे. याच्या बातम्या येत असतानाच नागरिकांकडून काळजी घेण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकी कोणती घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे आता प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पुण्यात या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. येथे रात्री 11 ते सकाळी सहापर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ही माहिती दिली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता राज्यासाठी कोणती नवी घोषणा किंवा नियमावली लागू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
जनजीवन हे पूर्वपदावर येत असताना कोरोना पुन्हा डोके वर काढत आहे. यामुळेच आता राज्य सरकारकडून कडक निर्बंध लागू केले जाण्याची शक्यता आहे. संध्याकाळी 7 वाजता मुख्यमंत्री काय बोलणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नागरिकांनी पुन्हा लॉकडाउन केला जाऊ शकतो, असा इशारा यापूर्वीच दिला होता. यामुळे आता मुख्यमंत्री नेमकी काय भूमिका मांडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
संपादन : सचिन पाटील
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- आणि त्यांनी थेट डॉक्टरांच्या नावानेच मागितले कर्ज; पहा कुठे उघडकीस आला लाखोंचा कर्जघोटाळा..!
- म्हणून अजित पवारांनी दिली वीजबिल वसुलीस स्थगिती; पहा कोणापुढे वरमले ठाकरे सरकार
- फडणविसांनी विधिमंडळात मांडले ‘हे’ महत्वाचे मुद्दे; पहा नेमके कशावर काय म्हटलेय त्यांनी
- फडणवीसांच्या ‘जलयुक्त’ची चौकशी जोरात; पहा कुठे होत आहे आढावा बैठक
- आई..गं.. हेडफोनचा बसतोय असाही फटका; कोट्यावधी लोकांवर झालेत ‘हे’ दुष्परिणाम.!