कर्फ्यू लागू करण्याबाबत ‘त्या’ मंत्र्यांचे मोठे विधान; वाचा, नेमकं काय म्हटले त्यांनी
मुंबई :
सध्या कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा महाराष्ट्रात आपले पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. येथे लागोपाठ संक्रमितांची संख्या वाढत चालली आहे, ज्यामुळे ठाकरे सरकारने सक्त आदेश दिले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. अनेक ठिकाणी लॉकडाउन लागण्याची शक्यता वाढत आहे. अमरावती, यवतमाळ, सातारा, पुणे आणि मुंबई अशा राज्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये मागील आठवड्यापासून कोरोना रुग्णांच्या दैनंदिन संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे.
राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना याबाबतचे संकेत दिले. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक यासारख्या शहरात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत चालले आहे.
विजय वडेट्टीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जर स्थिती सुधारली नाही, तर महाराष्ट्रात संध्याकाळी 6 ते रात्री 8 पर्यंत नाईट कर्फ्यू लागू केला जाऊ शकतो.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही मुंबईतील के ईस्ट (अंधेरीपूर्व जोगेश्वरी), टी वॉर्ड (मुलुंड), आर सेंट्रल (बोरिवली), एम वेस्ट (चेंबूर, टिळक नगर) या भागात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचं सांगितलं आहे.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- ‘त्यामुळे’ वाढणार कार प्राईस; पहा नेमका काय फायदा-तोटा होणार सामान्यांना
- ‘त्या’ लोकप्रिय अॅपद्वारे घुसतोय मालवेअर; पहा कोणती आहेत धोकादायक अॅप्लिकेशन
- बाजारभाव अपडेट : नाशकात टोमॅटो जोरात; वाचा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : ‘त्या’ठिकाणी हरभरा 7,000 वर; वाचा संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : तूर 7,000 च्या पार; वाचा राज्यात कुठे, किती मिळतोय भाव