उंदीरचे नाव ऐकताच लोकांना त्यांच्यामुळे होणारे नुकसान आठवते, तेच उंदीर आसाममधील काही लोकांच्या उत्पन्नाचे स्रोत बनले आहेत. आसाममधील कुमारिकाता या गावात उंदरांना आणि त्यांना पकडणार्या लोकांना बरीच मागणी आहे. हे गाव गुवाहाटीपासून 90 किमी अंतरावर आहे. भारत भुतानच्या सीमेवर हे गाव वसलेले आहे.
वास्तविक पाहता आसामच्या या गावात लोक उंदराचे मांस मोठ्या उत्साहाने आणि चविने खातात. या गावात 200 रुपये किलोने उंदीर विकले जातात. या गावच्या बाजारात बरेच आदिवासी मृत उंदीर उकळवून विकताना दिसतील.
स्थानिक शेतकरी उंदीर शिकार ही शेतीसाठी चांगले मानतात कारण ते त्यांच्या पिकांचे नुकसान करतात. पण उंदीर पकडणे हा काही लहान मुलांचा खेळ नाही. त्यांना पकडण्यासाठी आदिवासींना कठोर परिश्रम करावे लागतात. कधी कधी हे आदिवासी रात्रीदेखील शिकार करायला जातात.
आदिवासी उंदीरांच्या बिळासमोर सापळे ठेवतात, उंदीर अन्नाच्या शोधात बाहेर पडताच त्यामध्ये अडकतात. हे मृत उंदीर दुसर्या प्राण्याने पकडून नेऊ नयेत, म्हणूनच हे मृत उंदीर रात्री देखील गोळा केले जातात.
सुरूवातीला तुम्हाला हे थोड किळसवाणे वाटेल, मात्र तेथील लोकांसाठी हे पारंपरिक खाद्य आहे. तिथे इतर प्राणी, पशू जास्त खाल्ले जात नाही.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- विधानपरिषदेच्या कामकाजाला ‘अशी’ झाली सुरुवात; वाचून नक्कीच वाटेल अभिमान
- प्रविण दरेकरांनी विधान परिषदेच्या सभापतींकडे ‘ही’ आग्रही मागणी; वाचा, नेमकं काय म्हणालेत ते
- बाजारभाव अपडेट : टोमॅटोच्या भावातही हलकीशी घसरण; वाचा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : हरभरा 6000 वर; वाचा संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : तूर 7,200 च्या पार; वाचा राज्यात कुठे, किती मिळतोय भाव