‘हे’ आहेत भारताचे 3 सर्वात ख़तरनाक कमांडो फ़ोर्स; ज्यांचे नाव घेतले तरी शत्रू थरथर कापतात
भारतीय सैनिक प्रत्येक कठीण काळात मोठ्या निर्भयतेने भारताचे संरक्षण करण्यासाठी सज्ज असते. एखाद्या शत्रू देशाला तोडीस तोड प्रत्युत्तर देणे असो किंवा देशाला नैसर्गिक आपत्तीपासून वाचवणे असो, भारतीय सैन्य नेहमीच पुढे असते.
भारतीय सैन्य आपला जीव मुठीत घेऊन काम भारतीयांसाठी लढत असते. देशाच्या हितासाठी या शूरवीरांना अनेकदा कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो.
आज आम्ही तुम्हाला भारताच्या 3 स्पेशल फ़ोर्सच्या कमांडोबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या नावाने शत्रू थरथर कापायला लागतो. आज भारताच्या या 3 ‘स्पेशल फोर्सेस’चे नाव जगभर गाजत असते. हे कमांडो इतके खतरनाक आहेत की, कोणताही शत्रू लगेच त्यांच्यापुढे गुडघेच टेकतो. कारण तसे करण्याशिवाय शत्रूला पर्याय नसतो.
- नेशनल सिक्योरिटी गॉर्ड (NSG) :-
‘नॅशनल सिक्युरिटी गार्ड’ (एनएसजी) ही भारतातील सर्वात ख़तरनाक कमांडो फोर्स आहे. एनएसजी कमांडोजची निवड भारतीय सैन्य, निमलष्करी दल आणि पोलिस यांच्या सर्वोत्तम सैनिकांमधून केली जाते. एनएसजीची स्थापना 1984 मध्ये झाली होती. त्याचे मुख्यालय दिल्लीत आहे. त्याचा हेतू ‘सर्वत्र सर्वोत्कृष्ट संरक्षण’ आहे.
- स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) :-
या यादीतील दुसरा क्रमांकावर येतात ते म्हणजे ‘स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप’ (एसपीजी). भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर 1988 मध्ये या फोर्सची स्थापना झाली. पंतप्रधानांच्या संरक्षणासाठी एसपीजीचे जवान तैनात असतात. त्याचे मुख्यालय दिल्लीत आहे आणि एसपीजीचा मोटो ‘शौर्यम समर्पणम् सुरक्षणम्’ आहे.
- मार्कोस कमांडो :-
‘मार्कोस कमांडो’ यांना पाणी, जमीन आणि हवेत लढा देण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. मार्कोस ही भारतीय नौदलाची एक विशेष शक्ती आहे. त्यांची स्थापना 1987 मध्ये झाली होती. ‘मार्कोस कमांडो’ हे बनणे खूपच अवघड आहे. प्रशिक्षण घेऊनही सैन्यातील 1000 कमांडोपैकी केवळ १ जन ‘मार्कोस कमांडो’ बनू शकतो. मार्कोसचा मोटो म्हणजे ‘द फ़्यू द फ़ीयरलेस’.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- बाजारभाव अपडेट : कांद्याच्या भावात घसरण; वाचा, राज्यात कुठे, किती मिळतोय दर
- मार्केट अपडेट : ज्वारीच्या भावात घसरण; वाचा, राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : हरभरा 6400 वर; वाचा संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : तूर 7,300 च्या पार; वाचा, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव
- बाजारभाव अपडेट : पुण्यात द्राक्षाला 9000 भाव; वाचा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट