दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात अनेक क्षेत्रात सकारात्मक व नकारात्मक बदल झाल्याचे दिसते. त्याबाबत उलटसुलट चर्चाही चालू असते. याच मोदीजींच्या सहा वर्षांच्या कार्यकाळातील कामामुळे देश डाळ उत्पादनात आत्मनिर्भर होण्याच्या मार्गावर आहे.
कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी जागतिक डाळी दिनी रोममधील आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलताना सांगितले की, जागतिक स्तरावर डाळींचे उत्पादन करणारा आणि ग्राहक म्हणून एक मोठा देश आहे. भारत हा डाळींच्या उत्पादनात स्वयंपूर्ण झाला आहे.
तोमर म्हणाले की, प्रथिनयुक्त डाळी हे भारतातील अन्न उत्पादनातील महत्त्वाचे पीक आहे. मागणी व पुरवठ्यातील तूट कमी करण्यासाठी डाळीचे उत्पादन वाढविण्यावर मोदी सरकार भर देत आहे. मागील सहा वर्षांत डाळींच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकार काम करीत आहे. त्यातून सरकारने वर्षाकाठी 15,000 रुपये वाचवण्यास सुरुवातही केली आहे.
कृषीमंत्री म्हणाले की, देशात गहू आणि धान खरेदी किमान आधारभूत किंमतीत (एमएसपी) चालू होती. मात्र, डाळी व तेलबिया खरेदीसाठी कोणतीही व्यवस्था नव्हती, केंद्र सरकारनेही आता कादाध्याने आणि तेलबिया यांची एमएसपीच्या आधारावर खरेदी करून शेतकर्यांना व्यवस्था केली आहे.
ते म्हणाले की, सहा वर्षांत डाळींचा एमएसपी 40 टक्क्यांवरून 73 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आला आहे, त्याचा फायदा निश्चितच शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. कुपोषण दूर करण्यासाठी डाळीचे उत्पादन आणखी वाढवण्याची आवश्यकता आहे. संपादन : माधुरी सचिन चोभे
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ घोटाळ्याची महाविकास आघाडी सरकार करणार चौकशी
- मुकेश अंबानींचा पुन्हा जगातील श्रीमंतांच्या ‘त्या’ यादीत प्रवेश; पहिल्या 100 श्रीमंतात आहेत ‘हे’ 3 भारतीय
- राकेश झुनझुनवाला आणि त्यांची कंपनी Rare Investmentsने विकले ‘त्या’ कंपनीतील 65 कोटींचे शेअर्स
- इंदिरा गांधींच्या ‘त्या’ वादग्रस्त निर्णयाला राहुल गांधींनीच ठरवले चूक; मात्र सांगितली ‘ती’ही गोष्ट
- बाब्बो.. ठाकरे सरकारचीही कृपा झाली अन ‘जैवविविधता’ताच धोक्यात आली..!