दिल्ली :
मागील पाच वर्षांत भारतीयांच्या डेटा ट्रॅफिकमध्ये ६० पटीपेक्षा वाढ झालेली असतानाच मोबाईलवर जाणारा वेळही दणक्यात वाढला आहे. मोबाइल ब्रॉडबँड इंडिया ट्रॅफिक (एमबिट) इंडेक्स, २०२१ यांच्या अहवालानुसार आता भारत जगातील अग्रणी देशांमध्ये समाविष्ट झाला आहे.
नोकियाने गुरुवारी याबाबतची आकडेवारी जाहीर केली. एमबिट इंडेक्सनुसार फोरजी डेटा वापरामुळे वर्ष २०२० मध्ये डेटा ट्रॅफिक दरवर्षी ३६% वाढला. यादरम्यान १० कोटी नव्या फोरजी ग्राहकांसह फोरजी ग्राहकां संख्या ७० कोटींवर गेली आहे.
देशात दरमहा डेटा वापर वाढण्याचे एक कारण ग्रामीण भागांत वेगाने वाढणारे नवे यूजर्स आहेत. मोबाइल हँडसेट करमणूक व उत्पादकतेच्या रूपात पुढे आले आहेत. अशावेळी भारतीय माणूस सरासरी पाच तास दररोज मोबाईलवर घालवत आहेत.
गेल्या काही वर्षांदरम्यान परवडणाऱ्या फोरजी हँडसेटच्या पुरवठ्यात वाढ व सरकार डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन देणे हे यामागचे कारण आहे. त्यामुळे टेक्नोलॉजी कंपन्या जोमात आहेत.
देशभरात एकूण डेटा ट्रॅफिकमध्ये एकट्या फोरजीचे योगदान ९८.७ टक्के राहिले. फोरजी हँडसेट बाळगणाऱ्यांची संख्या ६०.७ कोटी पार झाली आहे. महत्वाचे म्हणजे महिला आता मोबाईल वापरत असून त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
संपादन : सचिन पाटील
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- फडणविसांनी विधिमंडळात मांडले ‘हे’ महत्वाचे मुद्दे; पहा नेमके कशावर काय म्हटलेय त्यांनी
- फडणवीसांच्या ‘जलयुक्त’ची चौकशी जोरात; पहा कुठे होत आहे आढावा बैठक
- आई..गं.. हेडफोनचा बसतोय असाही फटका; कोट्यावधी लोकांवर झालेत ‘हे’ दुष्परिणाम.!
- ‘तिथे ठेवलेत राठोडांनी दिलेले 5 कोटी’; पूजाच्या आजीने केला धक्कादायक दावा
- पूजाप्रकरणी कोटींचे दावे; आरोप-प्रत्यारोप आणि गोंधळात गोंधळ..!