दिल्ली :
सध्या कांद्याच्या दरात वाढ झालेली आहे. अगदी ठोक बाजारातही कांद्याने भाव खाल्ला आहे. आता कांद्याचे भाव अजून वाढण्याची शक्यता सांगितली जात होती. मात्र आता येत्या पंधरा दिवसात नवीन कांदा मार्केटमध्ये दाखल होणार असल्याने कांद्याचे दर वाढण्याची शक्यता तूर्तास तरी कमीच आहे.
आवक वाढल्यास दर खाली येईल. सध्या महाराष्ट्रात कांद्याचे सरासरी दर 30 ते 35 रुपये प्रति किलो आहे. सध्या हवामान ठीक आहे. त्यामुळे अशा हवामानात कांद्यांचं चांगलं उत्पादन मिळेल. रब्बी हंगामातील कांदा बाजारात येणार असून भावही कमी होतील, अशी माहिती महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भरत दिघोले यांनी दिली आहे.
एकूण उत्पादनापैकी 65% कांदा रब्बी हंगामात पिकवला जातो. म्हणून तिसर्या हंगामातील कांदा अजून येणार आहे. त्यामुळे आता कांद्याच्या भावात वाढ होणार नसल्याचे बर्यापैकी स्पष्ट आहे. काल कांद्याला चांगले दर मिळाले होते. काल सोलापूर, वैजापूर अशा काही ठिकाणी कांद्याने 5 हजारी पार केली होती. अजूनही कांद्याला चांगले भाव मिळत आहेत.
संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- ‘त्या’ शिक्षक, कर्मचाऱ्यांना खुशखबर; वेतन आयोगाबाबत सरकारने केली मोठी घोषणा
- पुन्हा मिळणार नाही सोने खरेदीची ही संधी; सलग आठव्या दिवशी सोन्याच्या दरात ‘एवढी’ घसरण, वाचा ताजे भाव
- देशात पहिल्यांदाच सुरू झालीय गाढवाच्या दुधाची डेअरी; दूध विकले जातेय ‘एवढ्या’ किमतीला; वाचा, भन्नाट स्टोरी
- दूध पिताना ‘या’ नक्कीच गोष्टी ठेवा लक्षात; अन्यथा…
- घर खरेदी करण्यासाठी सुवर्णसंधी : ‘या’ 2 बँकांनी दिलीय गुड न्यूज