अहमदनगर :
जिल्हा बँक निवडणुकीच्या अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी विद्यमान चेअरमन सिताराम पाटील गायकर, मंत्री शंकरराव गडाख , माजी आमदार राहुल जगताप, माधवराव कानवडे व आमदार आशुतोष काळे या पाच ही नेत्यांची बिनविरोध निवड झाली आहे.
मंत्री गडाख यांच्या विरोधात रत्नमाला विठ्ठलराव लंघे, कारभारी जावळे, शिवाजीराव शिंदे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने मंत्री शंकरराव गडाख यांची बिनविरोध निवड झाली. तसेच विद्यमान चेअरमन सिताराम पाटील गायकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.
आमदार राहुल जगताप यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार बाजार समितीचे संचालक वैभव पाचपुते आणि प्रवीण कुरुमकर यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने जगताप यांचा जिल्हा बँकेचे संचालक होण्याचा मार्ग सुकर झाला.
संगमनेर सोसायटी मतदारसंघातून माधवराव कानवडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या विरोधात असलेल्या चौघांनी आपले अर्ज मागे घेतल्याने कानवडे यांची बिनविरोध निवड झाली. मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे गटाभोवती बँकेची निवडणूक केंद्रीत झाली आहे.
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- म्हणून अदानी-अंबानींच्या संपत्तीत इतकी दमदार वाढ; पहा कोण आहे आघाडीवर..!
- म्हणून औरंगाबादेत निर्माण झाला तणाव; शिवसेनेचे नेते माजी आमदार झाले झटक्यात फरार..!
- MG ने दिल्या 5 रेट्रोफिटेड हेक्टर अॅम्ब्युलन्स; गडकरींच्या हस्ते सेवेला सुरुवात
- म्हणून सोयाबीन खातेय भाव; पहा कुठे कितीवर स्थिरावलेत मार्केट रेट
- हरबऱ्यामध्ये तेजी, मात्र मिळेना हमीभाव; पहा राज्यभरात कुठे, किती मिळतोय बाजारभाव