‘त्या’ कारणामुळे थांबली द्राक्ष खरेदी; थंडीचा आणि ढगाळ वातावरणाचा द्राक्ष पिकाला बसला मोठा फटका
सांगली :
सध्या राज्यात काही ठिकाणी ढगाळ आणि काही ठिकाणी पावसाचे वातावरण आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम पिकांवर होताना दिसत आहे. द्राक्ष पिकाच्या अडचणी मात्र अजूनच वाढल्या आहेत. नाशिक आणि सांगली या द्राक्ष पट्ट्यात वातावरणात बदलाचा फटका बागेला बसू लागला आहे.
आधिक द्राक्ष निर्यात करण्यास अडचणी येत असल्याने द्राक्ष खरेदी थांबलेली आहे. अशातच 3 दिवसांपूर्वी तासगाव तालुक्यात पाऊस झाला. तयार द्राक्ष मणी क्रॅकिंग, डाऊनीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे. परिणामी द्राक्ष उत्पादक शेत्क्र्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. द्राक्ष उत्पादक शेतकर्याने दिलेल्या माहितीनुसार, बदलत्या वातावरणामुळे द्राक्ष बागांना नुकसान होत आहे. द्राक्ष मणी तडकायला लागले असल्याने पिकाची मोठी अडचण निर्माण झाली आहे.
काल नाशिकमधील द्राक्ष पट्ट्यातही थंडीचा फटका बसताना दिसत आहे. थंडीची लाट व बर्फवृष्टीमुळे द्राक्ष मालाला उठाव नाही त्यातच पिकाचे नुकसान होण्याची शक्यताही वाढत आहे. तज्ञांनी दिलेल्या महितीनुसार, तापमानात सातत्याने मोठा बदल होत राहिला तर द्राक्ष पिकांना मोठा फटका बसून गुलाबी मणी होण्याची समस्या वाढू शकते. तसेच मणी फुगवण अवस्थेतील पिकांना वाढ होण्यास अडचणी येण्याचीही शक्यता आहे.
अशातच अनेक ठिकाणी निर्यातीस अडचणी येत असल्याने व्यापार्यांनी खरेदी थांबवलेली आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकर्यांची डोकेदुखी वाढली आहे.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- दूध पिताना ‘या’ नक्कीच गोष्टी ठेवा लक्षात; अन्यथा…
- घर खरेदी करण्यासाठी सुवर्णसंधी : ‘या’ 2 बँकांनी दिलीय गुड न्यूज
- म्हणून झाली सरावासराव सुरू; पहा नेमके काय म्हटलेय सभापती दातेंनी
- तर ‘त्या’ बोअरवेल चालक-मालकांवर होणार कारवाई; पहा नेमका काय झालाय निर्णय
- ठेकेदाराच्या चुकीचा ड्रायव्हर्सना फटका; पहा नेमका काय घोळ झालाय लायसन्सचा