अहमदनगर :
ग्रामपंचायत निवडणूक झाल्यावर आता सरपंच या महत्वाच्या पदाच्या निवडी केल्या जात आहेत. त्यामुळे सध्या राज्यभरात सदस्यांची पळवापळवी जोमात सुरू आहे. निघोज (ता. पारनेर) येथील दोन सदस्यही अशाच पळवापळवीच्या घटनेमुळे चर्चेत आलेले आहेत. मात्र, ते पळवले गेले की पळून गेले हेच कोडे अवघ्या तालुक्याला पडले आहे.
रविवारी ही घटना घडली. आता सरपंच पदाची निवड झाल्यावरच त्यांच्या गायब होण्याचे मूळ कारण स्पष्ट होणार आहे. निघोज येथील सदस्य सहलीवर होते. दरम्यान, लघुशंकासाठी गाडीतून खाली उतरल्यावर खेड (जि. पुणे) येथून दोघेजणही गायब आहेत. त्याना आठ-दहा जणांनी पळवले आहे.
निघोज गावात सध्या संदीप वराळ यांच्या गटाचे 8 सदस्य निवडून आलेले आहेत. तर, सत्ताधारी ग्रामविकासला फ़क़्त 4 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे महाविकासच्या दोन आणि इतर स्वतंत्र 3 सदस्यांना मोल आलेले आहे. अशावेळी सदस्यांची पळवापळवी जोमात आहे. त्यातूनच हा प्रकार घडला आहे. दरम्यान, या घटनेमुळे गावात निषेधाचे आंदोलन चालू आहे.
संपादन : सचिन पाटील
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- बाजारभाव अपडेट : तूर 7,200 च्या पार; वाचा, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव
- बाजारभाव अपडेट : हरभरा 6600 वर; वाचा संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- मार्केट अपडेट : ज्वारीच्या भावात घसरण; वाचा, राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : कांद्याचे भाव घसरले; वाचा संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- निवडणुकांचा बिगुल वाजला; ‘या’ 5 राज्यांच्या होणार निवडणुका; वाचा, संपूर्ण वेळापत्रक