मुंबई :
आज देशाला बदनाम करण्यासाठी कट रचणारे या स्तरावर पोहोचले आहेत की त्यांनी भारताचा चहाही सोडला नाही. भारताच्या चहाची प्रतीमा मलिन करायची असल्याचं हे कट रचणारे म्हणत आहेत. काही दस्तऐवज समोर आले आहेत. भारताची ओळख ज्या चहाशी आहे त्यावर हल्ला करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचं यातून समोर आलं आहे, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी टुलकिट खुलाशावर भाष्य केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, तुम्हाला हे सर्व चालणार आहे का? हा हल्ला करणाऱ्यांचं कौतुक तुम्हाला मान्य आहे का? या सर्व राजकीय पक्षांना भारताचा चहाची बाग असलेलं ठिकाणच उत्तर देईल. भारताच्या चहावर करण्यात येणाऱ्या हल्ल्यांमध्ये इतकी ताकद नाही की ते या चहा कामगारांचा सामना करू शकतील.
यावेळी ते आसाममध्ये बोलत होते. आज मोदींच्या हस्ते आसाममध्ये ७ हजार ७००कोटी रुपयांच्या ‘असोम माला’ प्रकल्पाचाचा शुभारंभ झाला तसेच दोन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यासाठी भूमिपूजन केले. यावेळी भाषणात ते म्हणाले की, आसामच्या भूमीवर या कट रचणाऱ्यांना जे काही कट रचायचे आहेत ते रचू दे. परंतु आम्ही ते यशस्वी होऊ देणार नाही. माझा चहा कामगार ही लढाई नक्कीच जिंकणार.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- मग ‘ते’ ३५ हजार कोटी गेले कुठे; पहा चव्हाणांनी मोदी सरकारच्या निधीवर नेमके काय म्हटलेय ते
- ..आणि ‘त्या’ नेत्यांसह केंद्रप्रमुखांचा अर्थपूर्ण प्रयत्न फसला; शिक्षकांच्या सतर्कतेचा परिणाम..!
- आणि त्यांनी थेट डॉक्टरांच्या नावानेच मागितले कर्ज; पहा कुठे उघडकीस आला लाखोंचा कर्जघोटाळा..!
- म्हणून अजित पवारांनी दिली वीजबिल वसुलीस स्थगिती; पहा कोणापुढे वरमले ठाकरे सरकार
- फडणविसांनी विधिमंडळात मांडले ‘हे’ महत्वाचे मुद्दे; पहा नेमके कशावर काय म्हटलेय त्यांनी