बजेट 2021 : केंद्रीय अर्थमंत्री सीतारामण यांनी केल्या ‘या’ 6 महत्वाच्या घोषणा; वाचा, ऑटो आणि आरोग्य धोरणात काय बदल केलेत ते
दिल्ली :
अर्थमंत्री म्हणाले की, आमचे बजेट 6 स्तंभावर अवलंबून आहे. कोरोना काळात सरकारने जीडीपीच्या 13 टक्के इतके आत्मनिर्भर पॅकेज दिले. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आपण आत्मनिर्भर भारतावर भर दिला पाहिजे.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, कोरोना कालावधीत आरबीआयने 27 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. आपण लॉकडाउन केला नसता जास्त प्राण गेले असते. सरकारने शेतक’्यांच्या खात्यावर पैसे पाठविले आहेत. 80 कोटी लोकांना मोफत रेशन वाटप करण्यात आले. कोरोना काळात 5 मिनी बजेट सादर केले गेले.
दशकातील हे पहिले बजेट आहे. हे डिजिटल बजेट आहे. हे आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यावर भर देईल, असेही पुढे बोलताना त्यांनी सांगितले.
- अर्थमंत्र्यांनी 64,180 कोटी रुपयांची आरोग्य योजना जाहीर केली. सर्व राज्यांचा आरोग्य डेटा बेस तयार केला जाईल. अनुसंधान, विकास आणि नाविन्य यावर लक्ष केंद्रित केले आहे.
- अर्थमंत्र्यांनी 17 नवीन हेल्थ इमरजेंसी सेंटर सुरू करण्याची घोषणा केली.
- अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नागरी जलजीवनासाठी 2.87 लाख कोटींची घोषणा केली.
- अर्थमंत्र्यांनी वाहन क्षेत्रासाठी वॉलेंटरी स्क्रैपिंग पॉलिसी जाहीर केली.
- लसीकरणासाठी 35,000 कोटी रुपयांची घोषणा केली.
- अर्थमंत्र्यांनी आरोग्य अर्थसंकल्प 94 हजार कोटींवरून 2.38 लाख कोटी रुपयांवर नेण्याची घोषणा केली आहे.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ घोटाळ्याची महाविकास आघाडी सरकार करणार चौकशी
- मुकेश अंबानींचा पुन्हा जगातील श्रीमंतांच्या ‘त्या’ यादीत प्रवेश; पहिल्या 100 श्रीमंतात आहेत ‘हे’ 3 भारतीय
- राकेश झुनझुनवाला आणि त्यांची कंपनी Rare Investmentsने विकले ‘त्या’ कंपनीतील 65 कोटींचे शेअर्स
- इंदिरा गांधींच्या ‘त्या’ वादग्रस्त निर्णयाला राहुल गांधींनीच ठरवले चूक; मात्र सांगितली ‘ती’ही गोष्ट
- बाब्बो.. ठाकरे सरकारचीही कृपा झाली अन ‘जैवविविधता’ताच धोक्यात आली..!