दिल्ली :
यंदाचे बजेट हे ओएलक्स बजेट म्हणून ओळखले जाण्याची शक्यता आहे. कारण, देशाच्या विकासाला गती देण्याच्या ‘उदात्त’ उद्देशाने यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने अनेक सरकारी कंपन्या आणि संस्था विक्रीची घोषणा केली आहे.
यावर्षात निर्गुंतवणुकीद्वारे 1.75 लाख कोटी उभारण्याचे उद्दीष्ट्य ठेवले आहे. आगामी आर्थिक वर्षात बीपीसील (BPCL), एअर इंडिया, कॉनकोर आणि एससीआय यांच्या निर्गुंतवणुवर शिक्कामोर्तब होत त्यांच्या विक्रीचा मार्ग मोकळा होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी याबाबतची घोषणा केली आहे.
कोरोना संकटामुळे निर्गुंतवणुकीचा आकडा फक्त 30 ते 40 हजार कोटींपर्यंत पोहचला आहे. हा आकडा गेल्या पाच वर्षातील सर्वात कमी आहे. अशावेळी विमा क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या एलआयसीचा आयपीओ आणण्याची सरकारची योजना आहे.
या आर्थिक वर्षात निर्गुंतवणुकीद्वारे सरकारला 17,958 कोटी रुपये मिळाले आहे. निर्धारित लक्ष्याच्या ते फक्त 8.5 टक्केच आहे. तसेच सरकारने विदेश संचार निगम लिमिटेडची 26.12 टक्के भागीदारी टाटा कम्युनिकेशन्सला दिली आहे. त्यातून सरकारला या आर्थिक वर्षात 8 हजार कोटी रुपये मिळणार आहेत.
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- बाजारभाव अपडेट : तूर 7,200 च्या पार; वाचा, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव
- बाजारभाव अपडेट : हरभरा 6600 वर; वाचा संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- मार्केट अपडेट : ज्वारीच्या भावात घसरण; वाचा, राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : कांद्याचे भाव घसरले; वाचा संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- निवडणुकांचा बिगुल वाजला; ‘या’ 5 राज्यांच्या होणार निवडणुका; वाचा, संपूर्ण वेळापत्रक