केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यावर आता शेअर बाजाराने याचे उत्साहात स्वागत केले आहे. मात्र, अनेक सरकारी कंपन्या विकल्या जाणार असल्याने डाव्या संघटनांनी यावर टीका केली आहे. तर, ‘मोदी सरकारने ब्रेक दुरुस्तीऐवजी थेट होर्नचा आवाज वाढवला..’ अशी टीका काँग्रेस नेते शशी थरूर यांनी केली आहे.
थरूर यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर मला एका गॅरेजच्या मॅकेनिकची गोष्ट आठवते. तुमच्या गाडीचा मी ब्रेक दुरुस्त करू शकलो नाही. त्यामुळे तुमच्या गाडीच्या हॉर्नचा आवाज वाढवून दिला आहे, असं हा मॅकेनिक सांगत असतो. केंद्र सरकारचा बजेट असाच काहीसा आहे.
एलआयसीत आयपीओ आणणार असल्याचंही जाहीर केलं. एलआयसीत आयपीओ आणल्यानंतर शेअर्स विकण्यात येईल, असं सीतारामन म्हणाल्या. सरकारने विमा कंपनीत परदेशी गुंतवणूक करण्यासही परवानगी दिली आहे. एफडीआयची मर्यादा आता 74 टक्के करण्यात आली आहे. ही मर्यादा आधी 49 टक्के होती. त्याशिवाय बँकेची रखडलेली कर्ज प्रकरणे मार्गी लावण्यासाठी बॅड बँकेची स्थापना करण्यात येणार आहे.
संपादन : सचिन चोभे
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- निवडणुकांचा बिगुल वाजला; ‘या’ 5 राज्यांच्या होणार निवडणुका; वाचा, संपूर्ण वेळापत्रक
- नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये बनले आहेत ‘हे’ 9 यादगार विक्रम; जे नेहमीच प्रत्येकाच्या लक्षात राहतील
- एका दिवसात 6 लाख कोटींचा फटका; वाचा, नेमकं कशामुळे झालंय ‘एवढं’ नुकसान
- मुकेश अंबानींच्या बंगल्याबाहेर कार प्रकरणाचा पहिला पुरावा हाती; वाचा, पोलिसांनी नेमकं काय शोधलय
- सोन्याच्या भावात मोठी घसरण; वाचा, काय आहेत ताजे दर