मुंबई :
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे सचिव जय शाह यांनी लिहिलेल्या पत्राला सर्व राज्य क्रिकेट संघटनांनी उत्तर दिले आहे. त्यानुसार यंदा रणजी ट्रॉफी ही क्रिकेट स्पर्धा होणार नाही. त्याच्याऐवजी देशांतर्गत क्रिकेटसाठी फ़क़्त दोन महिने शिल्लक असल्याने विजय हजारे ट्रॉफी हीच स्पर्धा आजोजित केली जाणार आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अर्थात बीसीसीआयने निर्णय घेतला आहे की, रणजी ट्रॉफीच्या जागेवर या हंगामात विजय हजारे ट्रॉफी आयोजित केली जाईल. कोरोनाने देशातील यंदा स्पर्धेचे वेळापत्रक पूर्ण बिघडले आहे. एप्रिलमध्ये आयपीएलचा हंगाम सुरू होणार असल्याने बीसीसीआयकडे कोणत्याही देशांतर्गत स्पर्धेसाठी फ़क़्त दोन महिने शिल्लक आहेत. हे सर्व लक्षात घेऊन बीसीसीआयने विजय हजारे ट्रॉफी आणि रणजी ट्रॉफीपैकी कोणतेही एक आयोजित करण्याबाबत सर्व संघटनांकडून मत मागितले होते. त्यानुसार रणजी स्पर्धा रद्द केली जात आहे.
मंडळाचे सचिव जय शाह यांनी राज्य संघटनांना पत्र लिहून या निर्णयाची माहिती दिली आहे. त्यात म्हटले आहे की, आपल्यासाठी महिला स्पर्धा असणे खूप महत्वाचे आहे. घरगुती हंगामात 2020-21 च्या आपल्या प्रतिसादावर आधारित हा निर्णय घेण्यात आला आहे.
संपदान : सचिन पाटील
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- पुन्हा मिळणार नाही सोने खरेदीची ही संधी; सलग आठव्या दिवशी सोन्याच्या दरात ‘एवढी’ घसरण, वाचा ताजे भाव
- देशात पहिल्यांदाच सुरू झालीय गाढवाच्या दुधाची डेअरी; दूध विकले जातेय ‘एवढ्या’ किमतीला; वाचा, भन्नाट स्टोरी
- दूध पिताना ‘या’ नक्कीच गोष्टी ठेवा लक्षात; अन्यथा…
- घर खरेदी करण्यासाठी सुवर्णसंधी : ‘या’ 2 बँकांनी दिलीय गुड न्यूज
- म्हणून झाली सरावासराव सुरू; पहा नेमके काय म्हटलेय सभापती दातेंनी