मी अण्णांचा पक्का समर्थक आहे.चाहता आहे, परंतु अंधभक्त नाही. त्यामुळे आंधळेपणाने त्यांच्या प्रत्येक गोष्टीचे समर्थन नक्कीच करणार नाही. पण त्याचवेळी ते चुकले म्हणून त्यांच्यावर वाईट भाषेत टीका करून त्या पातळीवर जाणार नाही. भक्त आणि नवभक्त केंद्र किंवा राज्य सरकार कितीही चुकले तरी कोणत्याही गोष्टींचे समर्थन करत असतात. पण ती चूक मी कधीच करत नाही. बरोबर आणि चूक एवढेच बघायला हवे. अण्णा हजारे यांना मागील आठवड्यात फडणवीस भेटले तेव्हाच मी अण्णांनी भाजपला भेट नाकारायला हवी अशी पोस्ट लिहिली होती कारण पुढे काय होणार आहे हे दिसत होते दुर्दैवाने ही भीती खरी ठरली.
लेखक : हेरंब कुलकर्णी (शिक्षक व विचारवंत, अकोले, अहमदनगर)
अण्णांना आपल्या वागण्याचे परिणाम काय होतील, कोणत्या प्रवृत्ती बळावतील याचे भान नसते. त्यातून अनेक समस्या निर्माण होतात. एकतर वयाच्या हिशोबाने अण्णांनी उपोषण हा विषय घ्यायला नको होता, आणि घेतला तर माघार घ्यायला नको होती. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जर तुम्ही बोलत आहात तर किमान शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून मी उपोषण करतो आहे अशीच भूमिका घ्यायला हवी. व ज्या दिवशी शेतकरी सन्मानाने दिल्लीतले आंदोलन संपवतील त्याच दिवशी माझे उपोषण संपेल अशी भूमिका घेतली असती, तर अण्णांच्या वयामुळे व उपोषणाच्या धोक्यामुळे सरकारवर दडपण वाढायला मदत झाली असती. देशातील सर्व शेतकरी व आंदोलक यांच्याशी पुन्हा एकदा जोडले गेले असते. परंतु, अण्णांनी त्यांच्या मागील उपोषणातील मागण्या इतकाच संदर्भ ठेवल्याने सरकारला त्याच मर्यादेत ठेवणे सोपे गेले व उपोषण मागे घेतले गेले. चूक असेल तर ही आहे. अण्णांनी देशातील संदर्भ लक्षात न घेता आंदोलन मागे घेतले ही खरी गंभीर चूक आहे.
अण्णा दोन्हीकडूनही मार खातात; ही पण एक समस्या आहे. समजा त्यांनी उपोषण सुरू केले असते व सरकारने त्यांना खूप महत्त्व दिले असते. तर शेतकरी आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्यासाठी व आंदोलनाचे श्रेय अण्णांना देण्यासाठी सरकार ही चाल खेळत आहे अशी टीका दुसरीकडून झाली असती. त्यामुळे काहीही झाले तरी अण्णा आता टीकेतून सुटत नाही असे झाले आहे.
ADVT.> अमेरिकन टुरिस्टर / पुमावर तब्बल 70% सूट आणि इतरही ऑफर : https://amzn.to/3r9GYs5
पण अण्णा भाजपाचे खेळणे आहेत व नागपूरच्या दडपणाखाली अण्णा काम करतात. अशी जी भाषा वापरली जाते ती मात्र चुकीची आहे. याचे कारण की समजा भाजपसाठी अण्णा काम करतात असे गृहीत धरले तर त्याबदल्यात अण्णाना काय मिळवायचे आहे? असा उलटा प्रश्न विचारायला हवा. एकतर पद्मविभूषणपर्यंतचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. मंदिरात राहणारे संपत्ती घेऊन या वयात ते काय करतील? त्यांना कोणाला तिकीट मिळवायचे नाही. त्यामुळे ही तडजोड ते दडपणाखाली का करतील? याची चर्चा व अशी टीका करायला हवी. मोदी त्यांच्या पत्रालाही किंमत देत नाहीत. यावरून अण्णा व भाजप नाते लक्षात घ्यावे. स्वभावदोष हा की, कुणी आदर दाखवला की ते हुरळून जातात व फडणवीस यांना ते जमते.
अण्णांना मी जवळून बघितल्यामुळे दोष हा दिसतो. गेल्या सहा वर्षात या सरकार विरोधात तुम्ही काहीच केले नाही ही टीका सातत्याने होत असल्याने त्या कॉम्प्लेक्समधून अण्णा या सरकार विरोधात काही करायला जातात व प्रतिसाद लोकांचा मिळत नाही. मोदी व शहा त्यांना जुमानत नाहीत. वय साथ देत नाही. त्यामुळे त्यातून ते सन्मानाने बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात आणि पुन्हापुन्हा फसतात असे त्यांचे मनोविश्लेषण आहे. दुसरा भाग असा की कोणत्याच संघटनात्मक रचनेतून त्यांचे व्यक्तिमत्त्व घडले नाही. की वाचन-चिंतन हेही केले नाही. त्यामुळे संघटनेचे शास्त्र, आंदोलनाचे शास्त्र, चळवळी या संकल्पनांशी त्यांचे काहीच नाते कधी आले नाही व कार्यकर्ते टिकले नाहीत. त्यामुळे त्यांचा पूर्ण व्यवहार हा व्यक्तिवादी आहे. ते स्वतःच्या व्यक्तीवादाभोवतीच फिरत राहतात. आतासुद्धा पूर्वी मी केलेल्या मागण्या व त्याला प्रतिसाद इतक्याच स्वतःभोवती ते फिरत राहिले. परंतु, शंभर शेतकरी जिथे मृत्यू पावले त्या आंदोलनाशी त्यांना जोडून घ्यावेसे वाटले नाहीत.
ADVT.> ‘टाटा क्लिक’वर खरेदी करा आणि 50 % सूट व बाय 2 गेट 1 फ्री ऑफर मिळावा : https://tracking.vcommission.com/SHJ4H
तेव्हा त्यांचा एक हितचिंतक म्हणून विलक्षण वेदनाही होतात आणि त्यांचा रागही येतो. पण तरीही सोशल मीडियात ज्यांनी असभ्य भाषेत त्यांच्यावर टीका होते त्या भाषेत मी कधीच करणार नाही. याचे कारण या माणसाने विविध कायदे येण्यासाठी केलेले योगदान. दारूबंदी, दप्तर दिरंगाई, पाणलोट व हजारो गावांना दिलेली प्रेरणा भ्रष्टाचाराविरुद्ध सामान्य माणसाच्या मनात जागा केलेला संताप आणि दिलेला लढा. एक अर्धशिक्षित मनुष्य त्याच्या आयुष्यात एकांडेपणाने किती विषय पुढे नेऊ शकतो याचे हे उदाहरण असल्यामुळे त्यांच्या भूतकाळातील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते आणि त्यांच्या मर्यादा लक्षात घेऊन त्यांना समजूनही घ्यावेसे वाटते. अण्णांनी आता शांतपणे निवृत्त व्हायला हवे व समाजानेही त्यांचा भूतकाळ आणि योगदान लक्षात घेऊन असभ्य भाषा न वापरता त्यांना समजून घ्यायला हवे. हेच वाटते. हे लिहितानाही वेदना होतात. मतभेद असल्यास टीका करायला हवी पण ८० वर्षाच्या अण्णांवर थेरडा, म्हातारा,अशा नीच भाषेत टीका करणाऱयांना फक्त इतकेच सांगावे वाटते की, अशी हिंमत तुम्ही अजित पवार, राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यावर करू शकता का? या भाषेत करणार नाहीत. कारण त्यांचे कार्यकर्ते घरात घुसून मारतील आणि अण्णा काहीच बिघडवत नाही म्हणून ही पातळी? अजित पवार थेट भाजपाबरोबर शपथ घेतात तरी अशी टीका कोणी एकेरी केली नव्हती आणि अण्णा मात्र भाजपाचे? तेव्हा अण्णांना सोशल मीडियातून सन्मानाने सेवानिवृत्त करू या..
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- बाजारभाव अपडेट : कांद्याच्या भावात घसरण; वाचा, राज्यात कुठे, किती मिळतोय दर
- मार्केट अपडेट : ज्वारीच्या भावात घसरण; वाचा, राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : हरभरा 6400 वर; वाचा संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : तूर 7,300 च्या पार; वाचा, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव
- बाजारभाव अपडेट : पुण्यात द्राक्षाला 9000 भाव; वाचा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट