म्हणून थेट राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच टाकला बहिष्कार; पहा कोणते पक्ष आहेत सहभागी
दिल्ली :
द्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. भारतीय संसदीय पद्धतीप्रमाणे राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात केली जाते. मात्र, त्याच अभिभाषणावर बहिष्कार टाकण्याची घोषणा तब्बल १६ राजकीय पक्षांनी केली आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनमधील अभिभाषणावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत 16 राजकीय पक्षांनी प्रसिद्धीत्रक जारी केले आहे. 9 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या या अधिवेशनात कृषी सुधारणा कायदे हाच केंद्रबिंदू राहणार आहेत.
त्यामुळेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. गुलाम नबी आझाद यांनी म्हटले आहे की, विरोधी पक्षांना विश्वासात न घेता सरकारने कृषी सुधारणा कायदे मंजूर केले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जेकेएनसी, द्रमुक, तृणमूल काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल, सीपीआय (एम), सीपीआय, आययूएमएल, आरएसपी, पीडीप, एमडीएमके, केरळ काँग्रेस, अेआययूडीएफ या राजकीय पक्षांचा बहिष्कार टाकण्याच्या निवेदनामध्ये सहभाग आहे.
संपादन : सचिन पाटील
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- ‘त्या’ शिक्षक, कर्मचाऱ्यांना खुशखबर; वेतन आयोगाबाबत सरकारने केली मोठी घोषणा
- पुन्हा मिळणार नाही सोने खरेदीची ही संधी; सलग आठव्या दिवशी सोन्याच्या दरात ‘एवढी’ घसरण, वाचा ताजे भाव
- देशात पहिल्यांदाच सुरू झालीय गाढवाच्या दुधाची डेअरी; दूध विकले जातेय ‘एवढ्या’ किमतीला; वाचा, भन्नाट स्टोरी
- दूध पिताना ‘या’ नक्कीच गोष्टी ठेवा लक्षात; अन्यथा…
- घर खरेदी करण्यासाठी सुवर्णसंधी : ‘या’ 2 बँकांनी दिलीय गुड न्यूज