राष्ट्रीय राजधानी दिल्लीत शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. अशावेळी देशभरातून दोन्ही बाजूने संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. मात्र, सरकार व आंदोलक यांच्यात संवाद नसल्याने मार्ग निघालेला नाही. त्यातच बॉलीवूडचे सुप्रसिद्ध पटकथा लेखक वरून ग्रोव्हर यांनी कालच्या घटनेला राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना जबाबदार ठरवले आहे.
त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, सगळी चूक ही नेहरू आणि गांधीजी यांची आहे. ना आपल्याला स्वातंत्र्य मिळाले असते ना प्रजासत्ताक दिवस असता. भले त्यांचे हे ट्विट खोचक आहे. मात्र, त्यातून जनतेला आणि सरकारच्या प्रतिनिधींनाही संवादातून मार्ग काढण्याचा स्वातंत्र्यातावादी दृष्टीकोन अजिबात नसल्याचे स्पष्ट दिसत असल्याके वरून यांनी लक्ष वेधले आहे.
हिंसाचाराच्या घटनेत 86 पोलीस कर्मचारी जखमी झाले असून 15 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुकरबा चौक, गाझीपूर, सीमापुरी, नांगलोई टी पॉंइंट, टिकरी बॉर्डर आणि लाल किल्ला भागात झालेल्या हिंसेत 86 पोलीस कर्मचारी जखमी झाले अहेत. तसेच या हिंसेत 17 खासगी गाड्यांचे नुकसान झाले आहे. गाजीपूर, सिंघु आणि टिकरी बॉर्डरवर आंदोलनकर्त्यांनी पोलिसांचे बॅरीकेड्सही तोडले आहेत. मात्र, किती शेतकरी जखमी झाले याची माहिती जाहीर झालेली नाही.
वरुण ग्रोवर हे स्वतंत्र लेखक आहेत. त्यांनी नेटफ्लिक्सवरील सुपरहिट सीरिज ‘सेक्रेड गेम्स’ची पटकथा लिहिली आहे. तसेच त्यांनी फॅन, उडता पंजाब, सोनचिडिया या चित्रपटांसाठी गाणी लिहिली आहेत. त्यांचे ‘पेपर चोर’ हे पुस्तक देखील प्रसिद्ध झालेले आहे.
संपादन : सचिन मोहन चोभे
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- राष्ट्रवादीला आवडतोय भाजपचाच घरोबा; शिवसेनेला दूर सारून पुन्हा घेतली पक्षविरोधी भूमिका..?
- बॉलिवूडच्या दारावर इन्कम टॅक्सची धडधड; वाचा, कुणाकुणावर झाली कारवाई
- दोन स्टॉक आणि दोन महिने; वॉरेन बफेने कमावले तब्बल 60 हजार कोटी
- प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ घोटाळ्याची महाविकास आघाडी सरकार करणार चौकशी
- मुकेश अंबानींचा पुन्हा जगातील श्रीमंतांच्या ‘त्या’ यादीत प्रवेश; पहिल्या 100 श्रीमंतात आहेत ‘हे’ 3 भारतीय