ब्रेकिंग : दिल्लीत शेतकर्यांवर लाठी चार्ज; राजू शेटटींवरही झाला गुन्हा दाखल, ‘त्यांच्या’ बेअक्कलपणाची कीव
दिल्ली :
एका बाजूला शेतकरी गेल्या दीड महिन्यापासून थंडीत शेती आणि मातीसाठी आंदोलन करत आहे तर दुसर्या बाजूला कठोर काळजाचे केंद्र सरकार लाल किल्ल्यावरून प्रजासत्ताक दिन साजरा करत आहेत. आज देशातील ऐतिहासिक आंदोलक शेतकर्यांनी एक मोठी ट्रॅक्टर रॅली आयोजित केली होती. आजवर अगदी शांतीत चाललेल्या आंदोलनाला गालबोट लागले असून आज या आंदोलनाला हिसक वळण लागले आहे. दरम्यान महाराष्ट्रात सांगली येथे माजी खासदार व शेतकरी नेते राजू शेट्टी यांनीही ट्रॅक्टर रॅली काढली. त्यावेळी त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेट्टी यांनी म्हटले आहे की, जाणीवपूर्वक दिल्लीतील आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे. गुन्ह्याविषयी बोलताना ते म्हणाले की, मोठे गर्दीचे कार्यक्रम जयंत पाटील, हसन मुश्रीफ, बंटी पाटील या लोकांनी घेतलेले होते. तिथे कोणतेही नियम पाळण्यात आलेले नव्हते. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला का? बाळासाहेब थोरात, बंटी पाटील यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला तेव्हा त्यांच्यावर गुन्हा दाखल केला का? , असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
केवळ सामान्य माणसांवर अशा प्रकारे पोलिस गुन्हा दाखल होत असेल तर त्यांच्या बेअक्कलपणाची कीव करावीशी वाटते. आणि यामुळेच कोंग्रेस रसातळाला गेली, असेही पुढे बोलताना ते म्हणाले.
संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- म्हणून अदानी-अंबानींच्या संपत्तीत इतकी दमदार वाढ; पहा कोण आहे आघाडीवर..!
- म्हणून औरंगाबादेत निर्माण झाला तणाव; शिवसेनेचे नेते माजी आमदार झाले झटक्यात फरार..!
- MG ने दिल्या 5 रेट्रोफिटेड हेक्टर अॅम्ब्युलन्स; गडकरींच्या हस्ते सेवेला सुरुवात
- म्हणून सोयाबीन खातेय भाव; पहा कुठे कितीवर स्थिरावलेत मार्केट रेट
- हरबऱ्यामध्ये तेजी, मात्र मिळेना हमीभाव; पहा राज्यभरात कुठे, किती मिळतोय बाजारभाव