दिल्ली :
दिल्लीत कडाक्याच्या थंडीत अजूनही पंजाब, हरियाणा आणि देशभरातील शेतकरी कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. सरकार आणि आंदोलन करणार्या शेतकर्यांमध्ये तब्बल अनेक बैठका झाल्या असून अद्यापही त्यातून तोडगा निघलेला नाही. आता सरकारने नरमाईची भूमिका घेता कायद्याला 2 वर्ष स्थगिती दिली असली तरी शेतकर्यांचे आंदोलन सुरूच आहे.
आता 26 जानेवारीला शेतकरी अजून आक्रमक होत ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहेत. मात्र या मोर्चाला केंद्र सरकार टरकले असल्याचे दिसून येत आहे. दिल्ली आणि आसपासच्या परिसरात पेट्रोल पंपांवर ट्रॅक्टरसाठी पेट्रोल अथवा डिझेल मिळणार नसल्याच्या पाट्या पेट्रोल पंपांवर लागलेल्या आहेत.
दिल्ली आणि आसपासच्या परिसरात ट्रॅक्टरवाल्यांना इंधन देण्यास बंदी का घातली आहे? कुणी घातली आहे? या मागे नेमका कुणाचा हात आणि स्वार्थ आहे, असे बरेच प्रश्न नागरिकांमधून विचारले जात आहेत. फक्त ट्रॅक्टरच नाही तर बाटलीतही पेट्रोल देणे बंद केले आहे. याचाही निषेध देशभरातील शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- PM मोदी आणि सीतारामन यांच्या आकडेवाडीत कोट्यावधींची तफावत; वाचा, नेमका कुठे झालाय घोळ
- मोठी बातमी… मोदी सरकार ‘या’ क्षेत्रातील शेकडो कंपन्या विकणार
- मराठा आरक्षण उपसमितीने घेतला सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या तयारीचा आढावा; वाचा, काय आहे परिस्थिती
- आता 7/12 आणि घरावर लागणार पत्नीचे नाव; महिलांनो, तुमच्या फायद्याची ही योजना घ्या समजून
- अवघ्या ६९ रुपयात मिळवा गॅस सिलिंडर; त्यासाठी करावे लागेल ‘हे’ एकच काम