प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आपला आवाज आणखी बुलंद करण्यासाठी दिल्लीमध्ये आंदोलक शेतकरी आणखी सक्रीय होत आहेत. सातवेळा झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांचे म्हणणे सरकारने ऐकून न घेतल्याने आता शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीला सुरुवात केली आहे.
नवीन कृषी कायद्यांबाबत केंद्र सरकारच्या विरोधात शेतकरी आंदोलन सुरूच आहे. दिल्लीच्या थंडी आणि पावसातही शेतकरी सलग 43 दिवस आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत. दरम्यान, आज त्यांनी ट्रॅक्टर रॅली सुरू केली आहे. कुंडली-मानेसर-पलवल (केएमपी) सिंधू, टिकरी, गाझीपूर आणि शाहजहांपूर (हरियाणा-राजस्थान सीमा) मधील सर्व प्रात्यक्षिक ठिकाणी हजारो शेतकरी ट्रॅक्टर मोर्च काढतील असे सांगण्यात आलेले आहे.
पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गासह दिल्लीच्या चार सीमांवर आज शेतकरी ट्रॅक्टर मार्च करणार आहेत. रॅलीच्या पार्श्वभूमीवर सिंहू दिल्ली सीमेवर मोठ्या संख्येने सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. त्याचवेळी भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत म्हणाले की, 26 जानेवारीसाठी ट्रॅक्टर रॅली तयार आहे. सरकारला पटवून देण्यासाठी आम्ही हे करत आहोत.
स्वराज अभियानाचे नेते योगेंद्र यादव म्हणाले की, नवीन कायदे जारी होऊन आता सात महिने झाले आहेत आणि त्यानंतर सरकारने शेतकर्यांशी सात फेरीत बोलणी केली आहे. पण तरीही शेतकऱ्यांचे सात शब्दही त्यांनी ऐकलेले नाहीत.
संपादन : सचिन मोहन चोभे
- कोट्यावधी रुपयांचे मालक असलेले ‘हे’ 5 क्रिकेटर्स आहेत फक्त 10 वी किंवा 12 वी पास; इतर नावे वाचून व्हाल शॉक
- ना भाजप, ना महाविकास आघाडी; ‘या’ मंत्र्यांच्या पॅनलने सगळ्यांनाच चारली धूळ
- आशिया खंडातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीत ‘या’ माजी उपमुख्यमंत्र्यांना धक्का; बारामतीकरांचे बारीक लक्ष भोवणार
- तृतीयपंथी असल्याने अर्ज नाकारलेल्या अंजली पाटलांचा निकाल आला समोर; वाचा, काय आहे निकाल
- अण्णांच्या राळेगणसिद्धीत घडला ‘हा’ प्रकार; ‘त्यांनी’ मारली बाजी